मालवाहतूक बसेसच्या चालकांना एसटी महामंडळाने कर्तव्यावर जाताना तब्बल पाच दिवस पुरेल इतके जेवण सोबत बाळगण्याच्या अजब आदेश दिला होता. त्यामुळे कोरोनाकाळात पाच दिवसाचे जेवण सोबत बाळगायचे कसे असा मोठा प्रश्न एसटी कर्मचाऱ्यांना समोर पडला आहे. यासंबंधित वृत्त मायमहानगर व आपलं महानगरने प्रकाशित केले होते. त्यानंतर खळबळून जागे झालेल्या एसटी महामंडळाचा पंढरपूर आगारातील आगार व्यवस्थापकांनी एसटी चालकांना शिदोरी नेण्याचा आदेश रद्द करण्यांत आलेल्या आहे.
शिदोरी नेण्याचा आदेश रद्द
आर्थिक अडचणीवर मात करण्यासाठी आणि एसटीचे महसूल वाढविण्याकरिता एसटी महामंडळाने मालवाहतूक क्षेत्रात उतरली आहे. त्यानुसार मालवाहतुकीच्या कर्तव्यावर जाणाऱ्या सर्व चालकांनी आपल्या पुरेल इतके पाच दिवसांचे जेवण घेऊनच कर्तव्यावर जाणे, कारण मालवाहतुकीसाठी गेलेला एसटी त्वरित परत येईल याची शक्यता खुप कमी असते. त्यामुळे कोविड १९ विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने एसटी कर्मचाऱ्यांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्तव्यांवर जाणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांनी पाच दिवसांचे जेवण सोबतच घेऊनच कर्तव्यावर यावे अशी सूचना राज्य परिवहन महामंडळाचे पंढरपूर आगारातील आगार व्यवस्थापकांनी ७ जुलै २०२० रोजी एसटीच्या कर्मचाऱ्यांना दिली आहे. त्यांच्या सुचनेचं परिपत्रक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेमुळे एसटी कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. या संबंधित वृत्त मायमहानगर व आपलं महानगरने प्रकाशित केले होते. त्यानंतर एसटी महामंडळाने यांची दखल घेतत, एसटी चालकांना शिदोरी नेण्याचा आदेश रद्द करण्यांत आलेल्या आहे. त्याऐवजी नविन आदेश काढण्यांत आले आहे.