राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मिळालेल्या धमकीच्या पत्रावर काल टीका केली होती. या टीकेला मुख्यमंत्र्यांनी थेट परदेशातून ट्विटरवर प्रत्युत्तर दिले. मोदीजी एका पक्षाचे नेते नसून देशाचे नेते असून पवारांची टीका दुर्दैवी असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. या ट्विटर वादात आता अजित पवार यांनी उडी घेतली असून ‘सिटिझन फर्स्ट’ म्हणजेच जनतेला शीर्षस्थानी ठेवून काम करा, असा सल्ला अजित पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.
काय म्हणाले अजित पवार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेहमीच वास्तव प्रश्नांवरुन दुसरीकडे लक्ष वळवण्याचा प्रयत्न करत असतात. राज्य चालवण्याची जबाबदारी पार पाडण्यात ते अपयशी ठरलेले आहेत. आज राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळलेली आहे. प्रत्येक शहरात असुरक्षित वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांना जनतेला शीर्षस्थानी ठेवत काम करण्याचा सल्ला अजित पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिला आहे.
. @Dev_Fadnavis diverting attention from real issues,as always. Clear that he's failing on law and order too. Reports that our cities in Maharashtra are increasingly unsafe being obscured by this frivolous scare campaign. Citizens first CM saheb. https://t.co/lMH570FXmU
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) June 11, 2018
राष्ट्रवादी काँग्रेसचा विसावा वर्धापन दिन आणि पश्चिम महाराष्ट्रातील हल्लाबोल आंदोलनाच्या समारोपाचा कार्यक्रम काल पुणे येथे संपन्न झाला. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी पत्राद्वारे मिळाली. अशाप्रकारची धमकी मिळाल्यानंतर शासकीय यंत्रणेचा वापर करत पत्र पाठवणाऱ्यांचा शोध घेण्याची गरज असते. मात्र भाजपने या पत्राचे भांडवल करुन लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला असल्याची टीका शरद पवार यांनी केली होती.
Hon PM @narendramodi ji is the leader of our nation and not just of a political party.@PawarSpeaks is not expected to stoop down to this level.
Police has all the evidences and truth will prevail.— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 10, 2018
यानंतर लगेचच परदेश दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. ‘शरद पवार यांनी केलेली टीका दुर्दैवी असून त्यांनी द्वेषाचे नाही तर देशाचे राजकारण करावे’, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली होती.