घरमहाराष्ट्रविहिरीत गुदमरुन एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

विहिरीत गुदमरुन एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

Subscribe

विहीर साफ करण्यासाठी विहिरीत उतरलेल्या एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची घटना रत्नागिरी येथे घडली आहे.

विहीर साफ करण्यासाठी विहिरीत उतरलेल्या तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना रत्नागिरीमधील निवसर गावात घडली आहे. हे तिघही एकाच कुटुंबातील व्यक्ती असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत विनय सागवेकर, नंदकुमार सागवेकर आणि अनिल सागवेकर या तिघांचा गुदमरुन मृत्यू झाला आहे.

नेमके काय घडले?

रत्नागिरीमधील निवसर गावात विहीर स्वच्छ करण्यासाठी सागवेकर कुटुंबातील तीन जण विहिर उतरले होते. मात्र या तिघांचा ही श्वास कोंडला गेल्यामुळे त्यांचा गुदमरुन दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या तिघांचे मृतदेह काढण्यसाठी फिनोलेक्स कंपनीची टीम रेस्क्युसाठी घटनास्थळी रवाना झाली असल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -