मुंबई : पत्राचाळ जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंगच्या आरोपांमुळे सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कारवाईमुळे खासदार संजय राऊत यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले होते, त्यांची न्यायालयीन कोठडी आज संपत आहे. त्यामुळे संजय राऊतांना आज जामीन मिळणार की पुन्हा कोठडी हे थोड्याच वेळात समजणार आहे. संजय राऊत सध्या मुंबईतील आर्थर रोड कारागृहात आहेत. इतर कैद्यांप्रमाणे राऊत यांनाही कैदी क्रमांक देण्यात आला आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांचा कैदी क्रमांक 8959 आहे. त्यांना 31 जुलै रोजी अटक करण्यात आली, त्यानंतर त्यांना 8 दिवसांच्या ईडी कोठडीत ठेवण्यात आले. ईडीने राऊतांना कोर्टात हजर केले होते, त्यांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.
संजय राऊत यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांना 10 बाय 10 ची स्वतंत्र बॅरेक मिळाली असून, त्यात स्वतंत्र स्वच्छतागृह आणि स्नानगृहही आहे, अशी माहिती सूत्रांच्या हवाल्यानं मिळाली आहे. त्यांना बेड आणि पंखाही मिळाला आहे आणि बॅरेकभोवती सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
अशा प्रकारे संजय राऊत तुरुंगातून महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. संजय राऊत तुरुंगात असताना महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींची माहिती वृत्त माध्यमांतून देत असतात. त्यांनी कारागृह प्रशासनाकडे वही आणि पेनाचीही मागणी केली होती, जी मंजूर झाली असून, आता ते दिवसभरात अनेकदा काहीतरी लिहीत असतात. एवढेच नाही तर त्यांनी अनेक पुस्तकांची मागणी केली होती, ती उपलब्ध करून देण्यात आली आहेत. तुरुंगात संजय राऊत काही ना काही वाचत राहतात.
काही दिवसांपूर्वी काही खासदार आणि आमदार राऊत यांची भेट घेण्यासाठी तुरुंगात गेले होते, मात्र त्यांना भेटू देण्यात आले नाही. कारागृह प्रशासनाचे म्हणणे आहे की, राऊतांना फक्त त्यांच्या कुटुंबीयांनाच भेटता येईल. याशिवाय अन्य कोणाला राऊत यांना भेटायचे असेल तर त्यांना न्यायालयाची परवानगी घ्यावी लागणार आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार राऊत यांना कारागृहात घरगुती जेवण आणि औषधे दिली जातात.
हेही वाचाः मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरील वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचा खोळंबा