घरताज्या घडामोडी'आपल्यातील भांडणे विसरुन सुरक्षिततेविषयी कठोर निर्णय घेणे'; फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना आवाहन

‘आपल्यातील भांडणे विसरुन सुरक्षिततेविषयी कठोर निर्णय घेणे’; फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना आवाहन

Subscribe

'आपल्यातील भांडणे विसरुन सुरक्षिततेविषयी कठोर निर्णय घेणे आवश्यक', असल्याचे आवाहन अमृता फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केले आहे.

‘महाराष्ट्रात गेल्या दोन महिन्यात चार Acid हल्ल्याच्या घटना घडल्या असून हे दुर्दैवी आहे. त्यामुळे आता आपण आपल्यातील भांडणे विसरुन सुरक्षिततेविषयी कठोर निर्णय घेणे आवश्यक’, असल्याचे आवाहन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केले आहे. वर्धा येथील हिंगणघाट आणि औरंगाबादमधील घटनेवर अमृता फडणवीस यांनी संताप व्यक्त केला आहे.

- Advertisement -

काय म्हणाल्या अमृता फडणवीस

अमृता फडणवीस यांनी ट्विट करत म्हटले आहे की, ‘महाराष्ट्रात गेल्या दोन महिन्यात चार Acid हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. हिंगणघाट येथे पेट्रोल टाकून प्राध्यापिकेला जाळण्याचा प्रयत्न केला गेला. तसेच ही घटना ताजी असताना पुन्हा एकदा औरंगाबादमधील बलात्काराचे प्रकरण ऐकून त्रास होत आहे. या घटना दुर्दैवी आहेत. त्यामुळे आता आपण आपल्यातील भांडणे विसरुन सुरक्षिततेविषयी कठोर निर्णय घेणे आवश्यक आहेत’. या ट्विटमध्ये अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टॅग केले आहे.

एकतर्फी प्रेमातून घडला हिंगणघाटचा प्रकार

हिंगणघाट येथील चौकात महाविद्यालयात शिक्षिका असलेल्या तरुणीला भरचौकात पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. हल्ल्यात भाजलेल्या तरुणीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर नागपूरमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या हल्ल्यात तरुणी ४० टक्के भाजली आहे. तिचा चेहरा पूर्णत: भाजला आहे. तरुणीच्या शरीरात मोठ्या प्रमाणावर धूर गेल्याने तिची वाचा देखील गेली आहे. तसेच तिची दृष्टीही राहिल की नाही, अशी शंका डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. तिच्यावर सध्या नागपुरातील ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तिची प्रकृती चिंताजनक असून ही पीडिता जीवन-मृत्यूशी संघर्ष करत आहे. दरम्यान, ही तरुणी सकाळी कामावर जाण्यासाठी निघाली असताना आरोपीने या तरूणीवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झाला. पोलिसांनी आरोपी विकी नगराळेला ताब्यात घेतले असून अटक केली आहे.

- Advertisement -

औरंगाबादमधील मृत्यूशी झुंजणाऱ्या महिलेचा मृत्यू

औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील अंधारी गावात एका ५० वर्षीय महिलेला गावातील बीअर बार चालकाने रात्री घरात घुसून अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिले. या घटनेत महिला ९५ टक्के भाजली होती. या महिलेवर औरंगाबादमधील घाटी रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारानंतर या महिलेचा मृत्यू झाला आहे.


हेही वाचा – शीना बोरा हत्याकांड : पीटर मुखर्जीला जामीन तर मिळाला, पण…


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -