मुंबई : ठाकरे गट विरुद्ध भाजप असा सामना रंगत असतानाच मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी माजी मंत्री आदित्य ठाकरेंना थेट आव्हान दिलं आहे. वरळीतील प्रलंबित प्रश्नावरुन आदित्य ठाकरेंवर निशाणा साधत हिम्मत असेल तर द्या राजीनामा आणि या वरळीत आमच्यासमोर असं आव्हानं त्यांनी दिलं आहे. (Ashish Shelar If you have courage resign and in this world Shelars challenge to Aditya Thackeray)
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार तथा माजी मंत्री आदित्य ठाकरेविरुद्ध आशिष शेलार असा सामना नेहमी रंगत असतो. अशातच आदित्य ठाकरे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले असून ते मुंबईसह राज्यभरात महानिष्ठा महा न्याय निमित्ताने दौरे करत असून, सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल करीत आहेत. अशातच आता भाजप मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदार संघातील विविध प्रश्नांबाबत प्रश्न उपस्थित करत ठाकरेंना धारेवर धरलं आहे.
ज्या वरळी विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व आमदार श्री आदित्य ठाकरे करतात…
◆ त्या वरळीतील झोपडपट्टी पुनर्विकासाचे प्रकल्प 20 वर्षाहून अधिक काळ रखडलेत, तुमच्या काळात एकही विट रचली गेली नाही.
◆ वरळी गावठाण, कोळीवाड्यातील जनतेचे कोरोना काळात अतोनात हाल झाले ते दुनियेने पाहिले.
◆…
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) February 19, 2024
हेही वाचा : Farmer Protest : सरकारच्या शिष्टाईला यश, ‘या’ कारणामुळे शेतकऱ्यांचे आंदोलन दोन दिवस स्थगित
हे प्रश्न उपस्थित दिलं आदित्य ठाकरेंना थेट आव्हान
मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी त्यांच्या X सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट करत आमदार आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. त्यांनी पोस्टमध्ये लिहिले की, ज्या वरळी विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व आमदार आदित्य ठाकरे करतात. त्या वरळीतील झोपडपट्टी पुनर्विकासाचे प्रकल्प 20 वर्षाहून अधिक काळ रखडले आहेत. तुमच्या काळात एकही विट रचली गेली नाही. वरळी गावठाण, कोळीवाड्यातील जनतेचे कोरोना काळात अतोनात हाल झाले ते दुनियेने पाहिले. कोस्टल रोडच्या खांबांमुळे वरळीच्या कोळी बांधवांचा व्यवसाय धोक्यात आला ते टाहो फोडत होते, तेव्हा पालकमंत्री असताना तर कोळी बांधवांना भेटायला सुद्धा तुमच्याकडे वेळ नव्हता असाही टोला आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंना लगावला आहे.
हेही वाचा : Politics : भाजपात नेमके जाणार तरी कोण, कमलनाथ की नकुलनाथ ? चर्चा थांबेना
वरळीतील जनात शोधतेय आमदार कुठे हरवले?
आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना आमदार आशिष शेलारांनी ट्वीटमध्ये पुढे लिहिले की, वरळीच्या बीडीडी चाळींतील व्यवसायिक गाळे आणि रहिवाशांना पुनर्विकासीत घरे देणे तुम्हाला जमले नाही, त्यात जमेल तेवढा खोडाच घातलात. कोस्टल रोड तर तुमच्या काळात न्यायालयात अडकला. पोलीस वसाहतील पोलिसांना तुम्ही घरे देऊ शकला नाहीत. वरळील जनता आजही शोध घेत आहे, आमदार कुठे हरवलेत? वरळीतून आता निवडून येणे शक्य नसल्याने, ठाण्यात जाऊन तोंडाच्या वाफा घालवणे सुरू आहे का? असा सवालही त्यांनी आदित्य ठाकरेंना विचारला. रंगरंगोटीच्या नावाखाली वरळीतील चार-दोन भिंतीना चुना लावून अशा प्रकारे वरळीतून पळ काढताय? मी तुम्हाला थेट आव्हान देतो. हिम्मत असेल तर द्या राजीनामा आणि या वरळीत आमच्या समोर असे थेट आव्हान त्यांनी ठाकरेंना दिले आहे.