घरमुंबई"शेतकऱ्यांच्या आंदोलनाला जाण्याची परवानगी दिल्याने सरकारचे आभार"

“शेतकऱ्यांच्या आंदोलनाला जाण्याची परवानगी दिल्याने सरकारचे आभार”

Subscribe

'मुंबईतील मोर्चा हा शांततेचा आहे, प्रतिकात्मक'

शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दिल्लीला जाण्यापासून रोखण्यात आल्यानंतर राज्यमंत्री बच्चू कडू यांना मुंबईत रिलायन्सच्या कार्यालयासमोर होणाऱ्या आंदोलनात सहभागी होण्यापासून देखील रोखण्यात आले. बच्चू कडू यांना नागपुरातचं रोखण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे बच्चू कडू यांना गेस्ट हाऊसमध्ये ताटकळत राहावे लागले होते. यानंतर साधारण दोन तीन तासांनी बच्चू कडू आंदोलनासाठी मुंबईत जाण्यासाठी निघाले. यावेळी निघताना बच्चू कडू म्हणाले, “शेतकऱ्यांच्या आंदोलनाला जाण्यासाठी परवानगी दिल्याने मी सरकारचे आभार मानतो.”

कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या विविध सीमांवर चार आठवड्यांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईतील रिलायन्सच्या कार्यालयावर मोर्चाचं आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालय ते बिकेसीमधील अंबानी, अदानीच्या कार्यालयावर हा मोर्चा निघणार आहे. या मोर्चात स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रहार संघटना तसंच राज्यातील शेतकरी सामील होणार आहेत.

- Advertisement -

प्रशासनाचा गैरसमज झाल्याने अडवणूक

राज्य सरकारनेच बच्चू कडू यांना रोखल्याने त्यावर आश्चर्य व्यक्त केलं जात असून रिलायन्स विरोधातील आंदोलनाला हवा मिळावी म्हणूनच बच्चू कडू यांना नागपुरात रोखून धरल्याचा ड्रामा करण्यात आला का? अशा चर्चांनाही सध्या उधाण आले आहे. परंतु मोर्चासाठी मुंबईला जाणारच असा बच्चू कडू यांचा निर्धार कायम असल्याने बच्चू कडू मुंबईला जाण्यासाठी निघाले. त्यावेळी तुम्हाला का रोखण्यात आलं असा प्रश्न माध्यमांनी त्यांना विचारला असता ते म्हणाले की, “प्रशासनाचा गैरसमज झाल्याने सकाळी थांबवलं होतं. मी वरिष्ठांशी बोलल्यानंतर त्यांनी सांगितलं की दुपारच्या विमानाने जाऊ शकता. मला परवानगी दिली म्हणून मी बाहेर पडतोय. मी सरकारचे धन्यवाद मानतो त्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला जाण्यासाठी मला अनुमती दिली.”

शेतकऱ्यांच्या हिताचा कायदा हवा…

“मुंबईतील मोर्चा हा शांततेचा आहे, प्रतिकात्मक आहे. अंबानी, अदानी यांच्या इशाऱ्यावर मोदी सरकार चालत आहे. त्यामुळे त्यांना विनंती करणार आहे की आपणही मोदींजींना समजावून सांगितले पाहिजे त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा कायदा आणला पाहिजे,” असेही बच्चू कडू यांनी यावेळी म्हणाले.


मुंबईत आज अंबानींच्या कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा धडकणार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -