मुंबई वडोदरा मार्गातील बाधित शेतकऱ्याला मोबदला न देता दुसऱ्याच व्यक्तीच्या नावाने धनादेश काढल्याने कुसूमबाई सुरेाशी या शेतकरी महिलेने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना कल्याणच्या प्रांतकार्यालयात घडली आहे. सुरोशी यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नेमके काय घडले?
रायता येथे राहणारे सुरोशी कुटुंब हे मुंबई वडोदरा मार्गातील बाधित शेतकरी आहेत. त्यांच्या नावावर सात बारा उतारा असून प्रांत कार्यालयातून त्यांना नोटीसही प्राप्त झाली आहे . सध्या भूसंपादनाचे काम सुरू असून जागेचा मोबदला मिळावा यासाठी वर्षभर प्रांत कार्यालयात फेऱ्या मारीत आहेत. मात्र, मोबदला मिळण्याऐवजी दुसऱ्याच व्यक्तीच्या नावाने धनादेश काढण्यात आला आहे. त्यामुळे आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नाही, असे कुसूमबाई यांचे नातेवाईक धर्मा सुरोशी यांनी सांगितले आहे.
हेही वाचा – शिवाजीपार्क मैदानाचा लवकरच कायापालट