जव्हार तालूक्यातील प्रसिद्ध काळमांडवी डोहात आंघोळीसाठी उतरलेल्या जव्हारमधील पाच युवकांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना गुरुवारी तीनच्या सुमारास घडली. हे पाचही जण जव्हार येथील अंबिका चौक भागातील रहिवासी आहेत.
जव्हार शहरातील १५ युवक सकाळी जव्हारपासून जवळच असलेल्या केळीचापाडा या गावाच्या हद्दीत असलेल्या नदी पात्रात पोहण्यासाठी आले होता. दुपारी वनभोजन उरकून त्यांनी पुन्हा आंघोळीसाठी नदीत उडया घेतल्या. पावसाळ्यात खाली उतरण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. यात तीन मोठे पाण्याचे डोह आहेत. मात्र डोहातील पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने यातील पाच तरूणांना आपला जीव गमवावा लागला.
रिंकू भोईर, देवेंद्र वाघ, निमेश पटेल, बबलू चव्हाण आणि फलटणकर अशी या मुलांची नावे आहेत. हे तरुण १८ ते २५ वयोगटातील आहेत. संध्याकाळी सर्वांचे मृतदेह हाती लागले. या घटनेनंतर जव्हार शहरात शोककळा पसरली आहे.
हे ही वाचा – …तोपर्यंत तबलिगींना भारत सोडता येणार नाही!