घरताज्या घडामोडीधक्कादायक! चारित्र्याच्या संशयावरुन पतीने पत्नीला जिवंत जाळले

धक्कादायक! चारित्र्याच्या संशयावरुन पतीने पत्नीला जिवंत जाळले

Subscribe

चारित्र्याच्या संशयावरुन पतीने पत्नीला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. याप्रकरणी आरोपीविरधात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चारित्र्याच्या संशयावरुन पतीने पत्नीला जिवंत जालल्याची धक्कादायक घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिला मारहाण करीत आग लावून पेटवून देणाऱ्या नवऱ्याविरूध्द विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर गंभीर भाजलेल्या महिलेला उपचारासाठी ठाण्यातील सिव्हिल रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नेमके काय घडले?

मिळालेल्या माहितीनुसार उल्हासनगरमधील कॅम्प नं.४ येथील भरतनगर कानसई रोड येथे सुमन (३०) ही महिला तिची ३ मुले आणि पती आत्माराम याच्यासोबत राहते. आत्माराम याला दारू पिण्याचे व्यसन असून तो सुमन हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला दररोज मारहाण करीत होता. दरम्यान, गुरुवारी रात्री १२.३० वाजताच्या सुमारास सुमन घरात स्वयंपाक करीत असताना आत्माराम दारू पिऊन घरी आला. त्याने सुमन हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्याशी भांडण केले. तसेच तिला शिवीगाळ करीत मारहाण केली. पतीच्या या त्रासाला कंटाळून सुमन हिने घरात असलेले डिझेल तिच्या अंगावर टाकून घेतले. त्याचवेळी आत्माराम याने त्याच्याजवळील माचीस काढून एक काडी पेटवून सुमन हिच्या अंगावर भिरकावल्याने तिच्या अंगावरील कपडयाने पेट घेतल्याने ती गंभीर भाजली. तिला उपचारासाठी उल्हासनगरातील मध्यवर्ती रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण ती ७४ टक्के भाजल्याने तिला उपचारासाठी ठाणे सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सुमन हिला जीवेठार मारल्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिने दिलेल्या फिर्यादीवरून आत्माराम पवार याच्याविरूध्द विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, आत्माराम हा पसार झाला असून विठ्ठलवाडी पोलीस त्याचा शोध घेत आहेत. तसेच याप्रकरणी भामे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक आर.आर.पाटील हे अधिक तपास करीत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – दिव्यात अनधिकृत बांधकामावर कारवाई; २९ हातगाड्या तर ११ बाकड्यांवर हातोडा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -