मुंबईसह उपनगरात काल, रात्रीपासून पावसाने जोर धरला आहे. यामुळे अनेक ठिकाणी वाहने पाण्यात अडकून वाहतूक खोळंबली आहे. याच, दरम्यान पावसामुळे दृश्यमानता कमी झाल्याने मुंबईतील सायन येथे ३ गाड्यांचा विचित्र अपघात झाला. या अपघातात तीन गाड्या एकमेकांना धडकल्या असून या अपघातात ८ जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Mumbai: 8 injured after three cars collided with each other in Andheri, due to low visibility following heavy rainfall in the city, early morning today. #Maharashtra pic.twitter.com/Ts2srOqxd3
— ANI (@ANI) July 24, 2019
सध्या मुंबईत जोरदार पाऊस पडत आहे. काही ठिकाणी रेल्वे रुळ पाण्याखाली गेल्याने रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. आज, बुधवारी पहाटे साडेपाच वाजेपर्यंत कुलाबा येथे १७१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर सांताक्रूझ येथे ५८ मिलिमीटर पाऊस झाला. मध्य रात्रीपासून मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊसाला सुरुवात झाली आहे. रात्रीपासून पावसाचा जोर कायम असल्यामुळे अनेक भागात पाणी साचले आहे.
Maharashtra: Roads waterlogged in King's Circle area of Mumbai, following heavy rains in the city. pic.twitter.com/PaZe4WDgWe
— ANI (@ANI) July 24, 2019
नवी मुंबई, गोवंडी, मानखुर्द, चेंबूर, ठाणे, दादर, सायन, कुर्ला, माटुंगा, परळ अंधेरी, हिंदमाता आणि लालबागमध्ये मध्यरात्रीपासून संततधार सुरू आहे. तर अनेक भागात मुसळधार पावसामुळे सायन – माटुंगा या रेल्वे मार्गावर पाणी साचल्यामुळे दादर ते कुर्ला दरम्यानची वाहतूक सध्या धीम्या गतीने सुरू आहे. तर मुसळधार पावसामुळे दादरच्या हिंदमाता आणि सायन परिसरात पाणीच पाणी झालं असून वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे.