घरमुंबईकोरोना काळात राज्यात पोलिसांवर हल्ले वाढले

कोरोना काळात राज्यात पोलिसांवर हल्ले वाढले

Subscribe

राज्यात हल्ल्याच्या ३६९ घटना

राज्यात कोरोना योद्धा सर्वसामान्यांना महामारीच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी जिवाच रान करत आहेत. पण समाजातील विकृत अशा व्यक्तींमुळे या कोरोना योद्ध्यांवर हल्ले करण्याचे प्रकार मात्र थांबताना दिसत नाहीत. राज्यात कोरोनाच्या संपुर्ण काळात कोरोना योद्ध्यांमधील नुसत्या पोलिसांवरच हल्ला करण्याच्या एकुण ३६९ घटना समोर आल्या आहेत. त्यामध्ये आतापर्यंत ८९८ व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच या प्रकरणातील पुढील कारवाई आता सुरू आहे.

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. परंतु काही दुष्ट प्रवृत्ती त्यांच्यावर हल्ला करीत आहेत. अशा हल्लेखोरांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आलेले आहेत. या दरम्यान पोलिसांवर हल्ला होण्याच्या 369 घटना घडल्या. त्यात 898 व्यक्तींना, ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.

- Advertisement -

कोविडचे २ लाख ७४ लाख गुन्हे दाखल

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात कलम 188 नुसार 2 लाख 74 हजार गुन्हे,तसेच 1347 वाहनांवर अवैध वाहतूकीचे गुन्हे दाखल झाले तर 29 कोटी 37 लाख रुपयांची दंड आकारणी करण्यात आली. अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. राज्यात 22 मार्च ते 2 ऑक्टोंबर पर्यंत कलम 188 नुसार 2,73,604 गुन्हे नोंद झाले आहे. तर 39,004 व्यक्तींना अटक करण्यात आली.96,532 वाहने जप्त केली. यातील विविध गुन्ह्यांसाठी 29 कोटी 37 लाख 76 हजार 782 रुपये दंड आकारण्यात आला.

कोरोना कक्ष

 

- Advertisement -

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने राज्यातील 225 पोलीस व 25 अधिकारी अशा एकूण 250 पोलिस कर्मचारी/अधिकारी बांधवांचा मृत्यू झाला. पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -