देशभर मुसलमानांनी जे मोर्चे काढले, त्याचा अर्थच लागला नाही.
जे जन्मापासून इथे राहत आहे. त्यांना कोण बाहेर काढत आहे? मग जे कायद्यातच अस्तित्वात नाही, त्याविरोधात तुम्ही ताकद कुणाला दाखवली.
बांगलादेशी आणि पाकिस्तानी मुसलमांनाना हाकलूनच लावलं पाहीजे, त्यात दुमतच नाही.
१९५५ साली नागरिकत्वाचा कायदा अस्तित्वात आला. १९५५ ची परिस्थिती वेगळी आहे. आज २०२० मधील परिस्थिती वेगळी आहे.
आपल्याकडे एकतर डाव्या बाजुला किंवा उजव्या बाजूला रहा, असे ठरवले जाते.
केंद्र सरकारची स्तुती केली तर भाजपच्या बाजुचे आणि केंद्र सरकारच्या चुकीच्या निर्णयावर टीका केली तर हे काँग्रेसच्या बाजुचे… यात मध्यममार्ग आहे की नाही?
पाकिस्तान दहशतवादाचा अड्डा बनलेला आहे. भारतात जे बॉम्बस्फोट झाले आहेत, त्याचा सूत्रधार पाकिस्तान आहे.
मुंबईत १९९२ साली जी दंगल झाली त्याचे कारण दाऊदने केलेले बॉम्बस्फोट आहेत. दाऊद कुठे बसलाय तर पाकिस्तानमध्ये…
CAA वर राज ठाकरे
मग अशा पाकिस्तानमध्ये हिंदू बांधवावर जर अन्याय होत असतील तर त्यांना परत घ्यायला नको का?
हे म्हणतात तिकडचे मुस्लिम पण घ्या? ते कशाला…
आता NRC
आमचा देश म्हणजे धर्मशाळा वाटला का यांना… आपल्या देशात शिक्षण, नोकरी, आरोग्याचे प्रश्न गंभीर आहेतच. पण त्याशिवाय बाहेरून येणाऱ्या घुसखोरांचा प्रश्न देखील तितकाच मोठा आहे.
पुण्यात एका बांगलादेशी तरुणाने मराठी आडनाव लावले. मराठी माणूस असल्याचे दाखवून मराठी मुलीशी लग्न लावले. नतंर कळले तो बांगलादेशी आहे.
आमचे मराठी मुस्लिम आहेत, तिथे आजवर कधीही दंगली झालेल्या नाहीत. याचा आम्हाला अभिमान आहे.
मात्र जिथे मोहल्ले आहेत, तिथले वातावरण खराब झाले आहे.
मीरा-भाईंदरमध्ये नायजेरीयन लोकांची वस्ती झाली आहे. हे नायजेरीय ड्रग्ज विकतात, स्वतः ड्रग्ज घेऊन महिलांची छेड काढतात. मात्र आम्ही षंढासारखे सर्व पाहत बसतो.
केंद्र सरकारला माझे आवाहन आहे. कायदे आणत असेल तर चांगले आहे. मात्र त्याची कठोर अमलबजावणी करण्याची धमक ठेवा.
कारण या घुसखोरांमुळे इथल्या पायाभूत सोयी-सुविधा आणि पोलीस यंत्रणेवर ताण येत आहे. मागच्यावेळी रझा अकादमीच्या मोर्चात पोलिसांवर हात उचलला गेला होता. महिला पोलिसांवर हात टाकला गेला. त्यावेळी याच मैदानात मी मोर्चा काढून त्याविरोधात आवाज उचलला होता.
आपण फक्त दंगल झाली की हिंदू असतो. एरवी आपल्याला कळत नाही. फक्त बांगलादेशमधून दोन कोटी घुसखोर आपल्या देशात आलेले आहेत. इतर देशातील लोकांची संख्या मोजलेली नाही.
NRC वरुन हिंदू मधील दलित आणि आदिवासींकडे पुरावे मागितल्याची भीती दाखवली जाते. दलित, आदिवासी देशातलेच आहेत. त्यांच्याकडे पुरावे मागायचेच कशाला? पण बाहेरून आलेल्यांची साफसफाई झालीच पाहीजे.
महाराष्ट्रातल्या पोलिसांना ४८ तास द्या, महाराष्ट्रातला क्राईम रेट शून्य टक्क्यावर आणू शकतात. मला पुर्ण खात्री आहे.
आज मोर्चाला मोर्चाने उत्तर दिले आहे. उद्या दगडाला दगडाने आणि तलवारीला तलवारीने उत्तर देऊ.
जगात दिले जात नाही, तेवढे स्वातंत्र्य या देशाने दिले आहे. त्यामुळे एकदिलाने रहा. देश बिघडवण्याचे काम करु नका.
जो इथला मुसलमान आहे, त्याने जागृत राहिले पाहीजे. काही चुकीचे चालत असेल तर ते येऊन सांगितले पाहीजे.
आज ज्या प्रकारे मोर्चाला मोर्चाने उत्तर दिले. त्याप्रमाणे भविष्यातही देऊ.