कोलकात्याच्या माजेरहाट पुलाचा काही भाग कोसळल्याची घटना ताजी असतानाचा महाराष्ट्रातल्या भिवंडीमधील राजीव गांधी उड्डाण पुलाचा स्लॅब अचानक कोसळल्याने खळबळ उडाली आहे. सुदैवाने या घटनेमध्ये कोणतिही जिवितहानी झाली नाही. मात्र सध्या या पुलावरील दोन्ही मार्गावरील वाहतूक थांबविण्यात आली आहे. या घटनेमध्ये प्रशासनाचा हलगर्जीपणा समोर आला आहे.
Thane: Portion of Rajiv Gandhi bridge in Bhiwandi collapses. More details awaited. #Maharashtra pic.twitter.com/t46DC5riPz
— ANI (@ANI) September 5, 2018
प्रशासनाचा हलगर्जीपणा
भिवंडीतील राजीव गांधी उड्डाणपुल हा धोकादायक असल्याचे गेल्या काही दिवसांपासून बोलले जात आहे. त्यामुळे महानगरपालिकेने या पुलाची दुरुस्थी करणे आवश्यक होते. मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी ही गोष्ट गांभिर्याने न घेता त्याकडे दुर्लक्ष केल्याने आज ही घटना घडली असल्याच आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. दहिहंडीच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भिवंडीत आले होते. त्यावेळी त्यांनी देखील याच पुलावरून प्रवास केला असल्याचे सांगितले जात आहे.
१२ वर्षातच पुल बनला धोकादायक
भिवंडीचा राजीव गांधी उड्डान पूल ३० एप्रिल २००६ साली बांधण्यात आला होता. १२ वर्षातच हा पुल धोकादायक झाला आहे. त्यामुळे या पुलावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. बुधवारी दुपारी पुलाचा स्लॅब कोसळल्याची घटना घडल्यामुळे आता स्थानिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. या घटनेनंतर हा पुल वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे.