घरमुंबईसंजय राऊत यांनी बिहार विधानसभा निवडणुकीवरून केले हे महत्त्वाचे प्रश्न उपस्थित

संजय राऊत यांनी बिहार विधानसभा निवडणुकीवरून केले हे महत्त्वाचे प्रश्न उपस्थित

Subscribe

नुकतेच बिहार विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहेत. काल निवडणूक आयोगाने मतदानाच्या तारखा जाहीर केल्या आहेत. सध्या सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी महाराष्ट्र आणि बिहार या दोन्ही राज्यांमधील राजकारण तापले आहे. त्यातच शिवसेना नेते संजय राऊत यांनी बिहार निवडणुकीसंबंधी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. बिहारमध्ये विकासाच्या, कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर निवडणूक झाली पाहिजे. पण जर मुद्दे संपले असतील तर मुंबईतून पार्सल होतील, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी हे प्रश्न उपस्थित केले आहे आहेत. दरम्यान, निवडणुकीची तयारी करताना कोरोना संपलाय का? बिहार निवडणुकीसाठी काय व्यवस्था करण्यात आली आहे हे देशाला सांगावे, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.

- Advertisement -

काय म्हणाले संजय राऊत

विधानसभेची मुदत संपत असेल तर निवडणूक झालीच पाहिजे. पण बिहारमध्ये कोरोना संपलाय का हेदेखील पाहिले पाहिजे. जर कोरोना संपला नसेल तर तुम्ही निवडणूक कशी घेणार आहात, प्रचारसभा कशा होणार?. मतदान तर ऑनलाइन करु शकत नाही, त्यासाठी जाऊन रांगेत उभं राहावं लागेल. सोबत मतदानाची टक्केवारीही कमी नाही झाली पाहिजे. जास्तीत जास्त लोकांनी मतदान करणं गरजेचं असून गरीब लोक आज घराबाहेर पडत नाहीयेत. बिहार एक मोठं राज्य आहे. देशाच्या राजकारणात बिहारचं महत्व आहे. त्यामुळे तिथे निवडणूक कशा पद्धतीने होणार आहे ? काय व्यवस्था करण्यात आली आहे हे देशाला सांगावं.

हेही वाचा –

WHO चा इशारा; कोरोनाचा फैलाव सुरू राहिल्यास लस येईपर्यंत २० लाख बळींची शक्यता

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -