घरमुंबईकेईएम रुग्णालयात राडा, शिवडी अपघातप्रकरणी नातेवाईकांचं आंदोलन!

केईएम रुग्णालयात राडा, शिवडी अपघातप्रकरणी नातेवाईकांचं आंदोलन!

Subscribe

शिवडी अपघातप्रकरणी वातावरण तापायला सुरुवात झाली असून जखमी आणि मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांनी अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

रविवारी संध्याकाळी ४च्या सुमारास शिवडीमध्ये झालेल्या कार अपघाताला आता वेगळं वळण लागलं आहे. या अपघातामध्ये जखमी झालेल्या आणि मृत पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांनी आता आरोपींविरोधात अजामीनपात्र गुन्हा दाखल करावा यासाठी आंदोलन सुरु केलं आहे. शिवाय अपघातामध्ये मृत झालेल्या दोघा तरुणांच्या नातेवाईकांनी अजामीनपात्र गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका घेतली आहे. आपल्या मागणीसाठी नातेवाईकांनी केईएम रुग्णालयाच्या बाहेर आंदोलन करत मुंबई पोलिसांविरोधात घोषणाबाजी देखील केली. यावेळी ‘चोर है, चोर है, मुंबई पोलीस, चोर है’, अशा घोषणा नातेवाईक देत होते.

पाहा काय घडतंय केइएमबाहेर!

शिवडी अपघात – केईएम हॉस्पिटलच्या बाहेर नातेवाईकांचा गोंधळ, चालकाला जामीन न मिळावा अशी मागणी

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಸೋಮವಾರ, ಜೂನ್ 10, 2019

- Advertisement -

 

काय झालं होतं रविवारी?

रविवारी संध्याकाळी शहाबाज इलियास बादी(२६) हा त्याच्या पत्नीसोबत अर्टिगा कारमधून शिवडीतून माझगावच्या दिशेने भरधाव वेगाने जात होता. यावेळी झकेरिया बंदरजवळ समोरच्या गाडीला ओव्हरटेक करताना शहाबाजचा गाडीवरचा ताबा सुटला. यामध्ये रस्त्याच्या कडेला बसस्टॉपवर उभ्या असलेल्या प्रवाशांना त्याने उडवले. समोर उभ्या असलेल्या ट्रकवर अर्टिगा गाडी आदळली. यामध्ये बसस्टॉपवर उभ्या असलेल्या दर्शन पाटील(१८)चा जागीच मृत्यू झाला, तर कल्पेश घार्गे (२५) या तरुणाचा केईएममध्ये उपचारांदरम्यान मृत्यू झाला. याशिवाय अर्टिगा चालक इलियास बादी, त्याची पत्नी, स्वाती पाटील(४०), निधी पाटील(१२), गौरी नांदगावकर(४०), जय नांदगावकर(१३) हे सहा जण जखमी असून त्यांच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

काय आहे नातेवाईकांची मागणी?

दरम्यान, अपघातामध्ये जखमी झालेल्या आणि मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांनी दोषी इलियास बादीविरोधात अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली आहे. किडवई पोलिसांनी या प्रकरणी ३०४ ए हा निष्काळजीपणाबद्दलचा जामीनपात्र गुन्हा दाखल केला आहे. मात्र, त्याच्यावर ३०४ बी हा अजामीनपात्र गुन्हा दाखल करावा अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. ‘जोपर्यंत पोलीस अजामीनपात्र गुन्हा दाखल करत नाहीत, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही’, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे. अपघात झाला, त्यावेळी इलियास बादी हा दारु पिऊन गाडी चालवत होता, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. ‘या प्रकरणी आमचा तपास सुरू असून इलियास बादीच्या दारूसेवनासंदर्भातल्या चाचण्या देखील आम्ही करत आहोत’, असं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -