घरमुंबईरेल्वेतून फिरण्याची हौस

रेल्वेतून फिरण्याची हौस

Subscribe

अल्पवयीन मुले उस्मानाबादला पळाली

रेल्वे प्रवासाचा आनंद लुटता यावा म्हणून दोघा मित्रांनी शक्कल लढवून थेट उस्मानाबाद गाठल्याची घटना समोर आली आहे. या मुलांच्या कुटुंबीयांनी शहर पोलीस ठाण्यात मुले हरवल्याची नोंद केली. मात्र, ही दोन्ही मुले एका मित्राच्या मावशीच्या घरी सुखरूप असल्याचा संदेश उस्मानाबाद येथून आल्याने कुटुंबीयांचा जीव भांड्यात पडला.

निषाद गौस शेख (14) आणि जावेद पापा शेख (17 रा.नेहरू नगर पहाडी ,नवीवस्ती ) अशी बेपत्ता झालेल्या मुलांची नावे आहेत. या दोघा मित्रांनी रेल्वेचा प्रवास करता यावा यासाठी कल्याण येथून ट्रेनमध्ये बसून थेट उस्मानाबाद गाठले. जावेद याची मावशी तेथे राहत असल्याने हे दोघेही उस्मानाबादला सकाळी पोहचले. मात्र, घराबाहेर पडलेली मुले उशिरापर्यंत घरी आली नाही. त्यामुळे या दोघांच्या हरवल्याची नोंद शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली. मात्र, जावेद याच्या मावशीने मुलांची विचारपूस केली असता ते दोघेही घरी काही एक न सांगता निघून आले आहेत, असे समजले.

- Advertisement -

त्यानंतर मावशीने तत्काळ जावेदच्या आईशी संपर्क करून जावेद आणि त्याचा मित्र निषाद हे दोघे उस्मानाबादला आल्याचे सांगितले. या घटनेबाबत पोलिसांना माहिती देण्यात येऊन त्यांना भिवंडीत आणण्यासाठी पोलिसांनी कुटुंबीयांना सूचना केल्या आहेत. अशी माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जीवन शेरखाने यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -