घरपालघरशिवसेनेने मच्छीमारांना वाऱ्यावर सोडले; विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचा आरोप

शिवसेनेने मच्छीमारांना वाऱ्यावर सोडले; विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचा आरोप

Subscribe

मच्छिमार समाजाने नेहमीच शिवसेनेला निवडणुकांमध्ये भरभरून मते दिली. या समाजाने शिवसेनेच्या पालख्या वाहिल्या. मात्र शिवसेनेने याच कोळी बांधवांना वाऱ्यावर सोडले.

मच्छिमार समाजाने नेहमीच शिवसेनेला निवडणुकांमध्ये भरभरून मते दिली. या समाजाने शिवसेनेच्या पालख्या वाहिल्या. मात्र शिवसेनेने याच कोळी बांधवांना वाऱ्यावर सोडले. सत्तेत आल्यानंतर शिवसेनेला मच्छीमार बांधवांचा विसर पडला आहे. महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता असून शिवसेनेचे पक्षप्रमुख हे राज्याचे मुख्यमंत्री असताना आजही मच्छीमारांना मदत मिळत नाही. त्यांचे प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत यासारखे दुर्दैव नाही, असा आरोप विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर यांनी पालघर जिल्हयाच्या दौऱ्यात केला.

तौक्ते चक्रिवादळाचा फटका बसलेल्या पालघर जिल्ह्यातील कोळी बांधवाना पुन्हा उभे करण्यासाठी कोळी महासंघाने मदतीचा हात पुढे केला आहे. त्यासाठी दरेकर पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी महासंघाचे अध्यक्ष व भाजप आमदार रमेश पाटील यांच्या पुढाकाराने अनेकांना आर्थिक मदत देण्यात आली. तसेच सातपाटी गावाकरता रुग्णवाहिका, एडवण गावाकरता कुपनलिकांसाठी निधीचे वाटप करण्यात आले.

- Advertisement -

यावेळी बोलताना दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर तोफ डागली. तौक्ते वादळात महाविकास आघाडी सरकारने मदतीची घोषणा केली. पण अद्यापही मदत केलेली नाही. मत्स्यव्यवसायाला मत्स्यशेती म्हणून व मच्छीमार ‘शेतकरी’ म्हणून मान्यता दिल्यास पीककर्ज व शेतकऱ्यांच्या सुविधा सवलती मिळतील. मच्छिमारांना दिलासा मिळेल यादृष्टीने राज्य सरकारने त्वरित पावले उचलावीत, अशी मागणीही दरेकर यांनी यावेळी बोलताना केली.

देवेंद्र फडणवीस यांचे सरकार असताना मच्छीमार समाजासाठी आम्ही खंबीरपणे उभे राहिलो. त्यांच्या समस्या सोडवल्या. परंतु महाविकास आघाडी सरकारकडे मच्छीमार समाजासाठी वेळ नाही. महविकास आघाडीमध्ये सुरू असलेल्या कुरघोडी सोडवण्याविण्यातच त्यांचा वेळ जात आहे. राज्य सरकारला जनतेशी व त्यांच्या प्रश्नांशी काही घेणे देणे नाही आहे, असा टोला दरेकर यांनी लगावला. याप्रसंगी आमदार रमेश पाटील, जिल्हा अध्यक्ष नंदकुमार पाटील, कार्याध्यक्ष प्रकाश बोबडी, सरचिटणीस सुजित पाटील, जिल्हा अध्यक्ष युवा मोर्चा समीर पाटील, एनएनएफ चेअरमन नरेंद्र पाटील, राजन मेहेर, रामदास मेहेर, राजहंस ठपके, देवानंद भोईर, अशोक हांबिरे, सचिन पागधरे उपस्थित होते.

- Advertisement -

हेही वाचा –

ग्रामसेविका निलंबित; ग्रामस्थांच्या तक्रारीला यश

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -