ढोल ताशे वाजवत,गुलाल उधळत,गणपती बाप्पा मोरया हा एकच जल्लोष करत महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचे १० सप्टेंबरला मोठ्या उत्साहात आगमन झाले. याशिवाय मुंबईतील अनेक सार्वजनिक मंडळांच्या बाप्पाचे आगमन झाले. गणपती बाप्पाची १० दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर रविवारी १९ संप्टेंबरला म्हणजेच अनंत चतुर्थीला बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली आहे. ‘गणपती बाप्पा मोरया…पुढच्या वर्षी लवकर या’ असा गणेशभक्तांचा जयघोष पाहायला मिळणार आहे. या लाडक्या बाप्पाच्या विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर जय्यत तयारी सुरु आहे. मुंबईतील सर्व प्रमुख गणेश मंडळे दरवर्षी त्यांच्या गणेश मूर्तीच्या विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर येतात. (छाया-दिपक साळवी)
- Advertisement -
हे ही वाचा – दानवे म्हणतात नागपूर-मुंबई बुलेट ट्रेन प्रस्ताव सादर करणार, मुख्यमंत्री म्हणाले मी…
- Advertisement -