मुंबई | “राष्ट्रवादी काँग्रेसचे 40 पेक्षा जास्त आमदार अजित पवार यांच्यासोबत आहे”, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. खूप आनंदचा आणि अभिमानाचा दिवस आहे. मोदींच्या नेतृत्त्वात देश आणि महाराष्ट्र पुढे जाणार आहे. हेच देश आणि महाराष्ट्राची गरज आहे.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “राजकीय भूकंप म्हणण्यापेक्षा पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वामध्ये अजित पवार आणि 40 पेक्षा अधिक आमदार महाराष्ट्राच्या कल्याणा करता एकत्र येत असतील, तर ही महत्त्वाची गोष्ट आहे. हा देश कोण चालवू शकतो, या देशाचे कल्याण कोण करू शकतो. पंतप्रधानांनी जो संकल्प केला आहे. त्या संकल्पाला साद देण्याकरिता अजित पवार आणि सर्व आमदारांचे अभिनंदन करतो.”
अजित पवार हे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ करणार आहे. राज्याला दोन उपमुख्यमंत्री मिळणार आहेत, या प्रश्नावर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “शपथविधी झाल्यानंतर तुम्हाला सर्व कळेल. भाजप म्हणून मी अभिनंदन करतो. देशा आणि महाराष्ट्र करत ही चांगली गोष्ट आहे.