घररायगडरस्ते विकासात हजारो झाडांची तोड; कडाक्याच्या उन्हाळ्यात सावली झाली दुरापास्त

रस्ते विकासात हजारो झाडांची तोड; कडाक्याच्या उन्हाळ्यात सावली झाली दुरापास्त

Subscribe

ऐन उन्हाळ्यात वाहनचालक रस्त्याकडेला उभे राहण्यास एखाद्या झाडाची सावली शोधत क्षणभर विश्रांती घेतो. मात्र याच झाडांची सावली आता दुरापास्त झाली आहे. रस्त्यांचा विकास झाला, मात्र शेकडो वर्ष याच वाहनचालकांना, प्रवाशांना सावली देणारी महाकाय वृक्ष तोडली गेली. रस्ते विकासाच्या नव्या धोरणात नवीन वृक्ष लागवड असली तरी अद्याप याला प्रारंभ झालेला दिसत नसल्याने झाडांची सावली मिळण्यास शेकडो वर्षांची प्रतिक्षा करावी लागते की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.

निलेश पवार: महाड
ऐन उन्हाळ्यात वाहनचालक रस्त्याकडेला उभे राहण्यास एखाद्या झाडाची सावली शोधत क्षणभर विश्रांती घेतो. मात्र याच झाडांची सावली आता दुरापास्त झाली आहे. रस्त्यांचा विकास झाला, मात्र शेकडो वर्ष याच वाहनचालकांना, प्रवाशांना सावली देणारी महाकाय वृक्ष तोडली गेली. रस्ते विकासाच्या नव्या धोरणात नवीन वृक्ष लागवड असली तरी अद्याप याला प्रारंभ झालेला दिसत नसल्याने झाडांची सावली मिळण्यास शेकडो वर्षांची प्रतिक्षा करावी लागते की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.
डोक्यावर रणरणते ऊन, मातीमधून उष्णतेच्या झळा आणि तोंडाला पाण्याची कोरड अशा परिस्थितीत रस्त्याने प्रवास करणारा प्रवासी झाडाची सावली शोधत आपली वाहने थांबवतो. डेरेदार वृक्षाच्या छायेत क्षणभर विश्रांती घेतो. मुंबई गोवा महामार्गावर तर महाकाय वृक्षांची साखळीच होती. अनेक वर्षापासून हे वृक्ष स्वतः उन्हात राहून रस्त्याने प्रवास करणार्‍या प्रवाशाला सावली देत होते. शिवाय कोकणातून जाणार्‍या या महामार्गाला निसर्गसौंदर्याची एक चाहूल देत होते. विविध मोसमात येणारी फळे खाण्याचा आनंद देखील प्रवाशांना येत होता. मात्र विविध विकासकामात महामार्ग आणि इतर मार्गावरील वृक्षांची मोठ्या प्रमाणावर कत्तल झाली आहे. रस्ते विकास करताना पर्यावरण पूरक रस्ते विकास कसा करता येईल याचा विचार झाला नाही. परिणामी वटवृक्ष होण्यासाठी वृक्षांना लागलेली शेकडो वर्ष एका क्षणात नष्ट झाले आहेत. यामुळे महामार्ग चौपदरी झाला असला तरी महामार्गाला शोभा देणारे वृक्ष मात्र आज दिसेनासे झाले आहेत. रस्ते विकासाबरोबर औद्योगिक क्षेत्रात देखील अशीच अवस्था निर्माण झाली आहे. नवनवीन कंपन्यांच्या कामांसाठी मोठ्या प्रमाणावर वृक्ष तोड होत आहे. कंपन्या मात्र पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून कंपन्या उभ्या करत आहेत.

इंदापूर-वडपाले दरम्यान १५८० वृक्ष तोड
महाड तालुक्यात गेली काही वर्षात विविध रस्त्यांची कामे सुरु आहेत. यामध्ये प्रामुख्याने मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरण, महाड रायगड मार्गाचे रुंदीकरण, महाड महाप्रळ पंढरपूरचे रुंदीकरण, महाड आंबडवे या रस्त्यांचा तर तालुक्यातील इतर ग्रामीण भागातील रस्त्यांचा देखील समावेश आहे. त्याशिवाय विविध विकासात्मक कामे देखील सुरु असल्याने यामध्ये देखील सातत्याने वृक्ष तोड होत आहे. मुंबई -गोवा महामार्गाच्या कामात इंदापूर ते वडपाले या दरम्यान १५८० वृक्ष तोडण्यात आले तर वडपाले ते कशेडी या दरम्यान २९४२ वृक्ष तोडली गेली आहेत.

- Advertisement -

महाप्रल – पंढरपूर मार्गावर होणार वृक्षतोड
महाड रायगड मार्गावर असलेले ९११ वृक्ष तोडेल जाणार आहेत. हीच स्थिती महाप्रल – पंढरपूर मार्गावर देखील आहे. याठिकाणी १३८ वृक्ष तोडले जाणार असल्याचे महाड वन विभागाकडून सांगण्यात आले आहे. महामार्ग ज्या पद्धतीने विकसित होत आहेत त्या पद्धतीने वृक्ष लागवड मात्र अद्याप सुरु झालेली नाही. तोडलेल्या वृक्षांच्या १० पटीत वृक्ष लागवड होणे अपेक्षित आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूला सावली देणारे वृक्ष लावले तरी शेजारी असलेल्या सरंक्षक कठड्यामुळे वाहन थांबवून सावलीचा आधार घेणे शक्य होणार नाही. यामुळे ऐन कडाक्याच्या उन्हात सावली मिळणे कठीण झाले आहे.

नवनवीन प्रकल्प राबवत असताना पर्यावरण संवर्धनाचा विचार केला जात नाही, यामुळे वन्यजीव आणि वनसंपदा नष्ट होत आहे. याबाबत शासनाने वेळीच विचार करणे गरजेचे आहे. मुंबई गोवा महामार्गावरील वनसंपदा ही या भागातील सौंदर्याला पोषक होती.
– चंद्रकांत कोकणे,  ज्येष्ठ पत्रकार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -