घररायगडखारेपाट विभागात हंडाभर पाण्यासाठी वणवण; पाणीसाठा उपलब्ध, मात्र नियोजनाचा दुष्काळ

खारेपाट विभागात हंडाभर पाण्यासाठी वणवण; पाणीसाठा उपलब्ध, मात्र नियोजनाचा दुष्काळ

Subscribe

पाणी टंचाई ग्रस्त गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी पेण पंचायत समिती मार्फत दरवर्षीप्रमाणे कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. टंचाई ग्रस्त शेकडो गाव, वाड्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी १ कोटी २५ लाखांचा आराखडा तयार करण्यात आला आहे.

भरपूर पाण्याची उपलब्धता असतानाही नियोजनाच्या दुष्काळामुळे पेण तालुका पाण्याअभावी होरपळत असल्याचे चित्र आहे. तिसरी मुंबई म्हणून पाहिले जात असलेल्या पेण तालुक्यात नवी मुंबईला पाणीपुरवठा करणारे मुबलक पाणी साठा असणारे हेटवणे धरण आहे. तसेच आकाराने छोटे असलेल्या आंबेगाव धरणातील मुबलक पाणी साठा वापर न होताच पडून आहे. तर दुसरीकडे खारेपाट विभागातील शिर्की, वाशी येथील जनतेला पाणी पुरवठा होत असलेल्या शहापाडा धरणातील पाणीसाठा कमी होत आहे. त्यामुळे या दोन्ही खारेपाट विभागात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. येथील नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.

पेण तालुक्यातील शिर्की विभागातील बोरी, शिर्की, शिर्की चाळ, शिर्की चाळ नं.१, २ बोर्वे , मसद, मसद बेडी, सागर वाडी, दरबार वाडी, शिंगणवट, भोई कोटा, बेणेघाट, सरेभाग या गावांबरोबर वाशी विभागातील वाशी, कणे, बोरझे, वढाव, मोठे वढाव, दीव, काळेश्री, भाल, मोठे भाल, नारवेल, ठाकूरबेडी आदी गावांना शहापाडा धरणातून पाणी पुरवठा केला जातो. मात्र,शहापाडा धरणातील पाणीसाठा मार्च महिन्यापासून कमी होत असल्याने या गावांतील हजारो कुटुंबांना मार्च महिन्यापासून पाणी टंचाईचा सामना करावा लागतो .पेण तालुक्यासाठी पिण्यासाठी व सिंचनासाठी पाणी आरक्षित असताना शासनाच्या नियोजना अभावी तालुक्यात दरवर्षी पाणी टंचाई निर्माण होते.

- Advertisement -

तत्कालीन आमदार धैर्यशील पाटील यांचे नेतृत्वाखाली १४ फेब्रुवारी २०१६ रोजी पेण ते मुंबई पायी संघर्ष यात्रा काढण्यात आली होती. यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हेटवणे ते वाशी, शिर्की पाणीपुरवठा योजनेसाठी एमएमआरडीएच्या माध्यमातून ३८ कोटी रुपये निधी दिला. त्यानंतर ही योजना सुरु देखील झाली. मात्र राज्यकर्त्यांची कमजोर मानसिकता व प्रशासनचा चालढकलपणा यामुळे ही योजना अद्याप अपूर्ण आहे.

पाणी टंचाई ग्रस्त गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी पेण पंचायत समिती मार्फत दरवर्षीप्रमाणे कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. टंचाई ग्रस्त शेकडो गाव, वाड्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी १ कोटी २५ लाखांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी ६५ लाख रुपयांच्या निधीचा समावेश आहे. इतर निधी हा विहीर दुरुस्ती, इंधन विहिरी यासाठी आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -