घरक्रीडाश्रीलंकेला हवंय आशिया चषक २०२२ चे यजमानपद, पण निर्णय बीसीसीआय सचिव जय...

श्रीलंकेला हवंय आशिया चषक २०२२ चे यजमानपद, पण निर्णय बीसीसीआय सचिव जय शाहांच्या हाती

Subscribe

आशिया चषक २०२२ (Asia Cup 2022) क्रिकेट स्पर्धेचे यजमानपद भूषवण्यासाठी श्रीलंका क्रिकेट मंडळ (एसएलसी) उत्सुक आहे. मात्र, श्रीलंकेमध्ये (Sri Lanka) सध्या राजकीय अस्थिरता निर्माण झालेली आहे. त्यामुळे आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद भूषवण्याची संधी मिळेल की नाही याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.

आशिया चषक २०२२ (Asia Cup 2022) क्रिकेट स्पर्धेचे यजमानपद भूषवण्यासाठी श्रीलंका क्रिकेट मंडळ (एसएलसी) उत्सुक आहे. मात्र, श्रीलंकेमध्ये (Sri Lanka) सध्या राजकीय अस्थिरता निर्माण झालेली आहे. त्यामुळे आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद भूषवण्याची संधी मिळेल की नाही याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. दरम्यान, आशिया चषकाच्या यजमानपदाबाबत आशियाई क्रिकेट परिषद (एसीसी) निर्णय घेणार आहे. या एसीसीचे अध्यक्ष बीसीसीआयचे सचिव जय शाह (Jay Shah) आहेत. त्यामुळे श्रीलंकेला या स्पर्धेचे यजमानपद मिळणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

५० कोटी रुपयांचे नुकसान

- Advertisement -

श्रीलंकेने यजमानपद गमावले तर त्याचे पाच ते सहा दशलक्ष डॉलर्स म्हणजे सुमारे ५० कोटी रुपयांचे नुकसान होऊ शकते. दरम्यान, २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर दरम्यान आशिया चषक स्पर्धा खेळवली जाणार आहे. त्यापूर्वी पात्रता स्पर्धाही होणार आहे. पात्रता स्पर्धा २० ऑगस्टपासून खेळवली जाणार आहे. त्यातून स्पर्धेतील सहावा संघ निवडला जाणार आहे. आयसीसीचे सदस्य असलेले भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान हे थेट मुख्य स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. स्पर्धेचे वेळापत्रक तयार झाले असले तरी यजमानपद कुणाकडे द्यायचे, याबाबत अनिश्चितता आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्धची मालिका

- Advertisement -

आशिया चषक स्पर्धेच्या यजमानपदाबाबत एसएलसीचे सचिन मोहन डिसिल्वा (Mohan Dacilva) यांनी इनसाइड स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, “आशिया चषकाच्या यजमानपदाबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. ऑस्ट्रेलिया विरुद्धची मालिका कशी आयोजित करतो यावर एसीसीचा निर्णय अवलंबून आहे. जय शाह आणि इतर एसीसी अधिकाऱ्यांनी आम्हाला आश्वासन दिले आहे की, जर सर्व काही सुरळीत पार पडले तर आशिया चषक आयोजित करण्याची संधी श्रीलंकेलाच मिळेल. भारत आणि पाकिस्तानसारख्या संघांचे यजमानपद भूषवल्यास मोठ्या प्रमाणात कमाई होते. त्यामुळे आम्ही श्रीलंकेत खेळण्यासाठी या देशांचे मन वळवण्याचा प्रयत्न करत आहोत. या स्पर्धेतून मिळणारा महसूल आमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे”, असे त्यांनी म्हटले.

१९ मार्च २०२२ रोजी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांची पुन्हा एसीसीच्या अध्यक्षपदी निवड झाली. कोलंबो येथे झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत एकमताने हा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे आशिया चषकाशी संबंधित सर्व निर्णयांमध्ये जय शाह काय निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


हेही वाचा – पदार्पणावरून कपील देव यांचा अर्जुन तेंडुलकरला महत्वाचा सल्ला; म्हणाले, ‘सचिनच्या ५० टक्के जरी बनला…’

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -