घरIPL 2020IPL 2020 : विराट कोहली म्हणतो, अब आयेगा असली मजा!

IPL 2020 : विराट कोहली म्हणतो, अब आयेगा असली मजा!

Subscribe

बंगळुरूचे खेळाडू सकारात्मक विचार करतील याची कोहलीला खात्री आहे.

आयपीएल प्ले-ऑफला गुरुवारपासून सुरुवात होणार असून क्वालिफायर-१ च्या सामन्यात मुंबई इंडियन्ससमोर दिल्ली कॅपिटल्स संघाचे आव्हान असणार आहे. त्यानंतर शुक्रवारी होणाऱ्या एलिमिनेटरच्या सामन्यात सनरायजर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे संघ आमनेसामने येणार आहेत. या सामन्यात पराभूत होणारा संघ स्पर्धेतून बाहेर होईल. बंगळुरूचा संघ सध्या फारसा फॉर्मात नसून त्यांनी सलग चार सामने गमावले आहेत, तर हैदराबादने त्यांचे मागील तिन्ही सामने जिंकले आहेत. मात्र, असे असले तरी बंगळुरूचे खेळाडू सकारात्मक विचार करतील याची कर्णधार विराट कोहलीला खात्री आहे. तसेच प्ले-ऑफला सुरुवात होणार असल्याने आता स्पर्धेत खऱ्या अर्थाने मजा येईल, असेही कोहली बंगळुरूच्या खेळाडूंना म्हणाला.

आपण सर्वांनी सकारात्मक विचार केला पाहिजे. मी तुम्हाला खात्री देतो की, आपल्याला मागील अडीच महिन्यांत जितकी मजा आली, त्यापेक्षा जास्त मजा आता प्ले-ऑफमध्ये खेळताना येईल, असे कोहली बंगळुरूच्या खेळाडूंशी चर्चा करताना म्हणाला. कर्णधार कोहली आणि प्रशिक्षक सायमन कॅटिच खेळाडूंशी संवाद साधतानाचा व्हिडिओ बंगळुरूच्या संघाने ट्विटरवर पोस्ट केला. प्ले-ऑफ गाठण्यात यश आल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन असे कॅटिच खेळाडूंना म्हणाले.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -