- Advertisement -
कळवा पूर्व न्यू शिवाजी नगर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने अनेक नागरिक अडकले होते. आपत्ती व्यवस्थापन च्या वतीने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. पाण्याचे प्रमाण प्रचंड असल्याने असल्याने बोटीचा वापर करत नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. ठाण्यात मुसळधार पाऊस झाला असून अनेक भागात पाणी साचले आहे. त्यामुळे विनाकारण बाहेर न पडण्याचे ठाणे पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे.
- Advertisement -