- Advertisement -
‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ हा चित्रपट येत आहे. दिग्दर्शक ओम राऊत हे या चित्रपटाचे दिग्दर्शक असून कालच त्यांनी चित्रपटाचा ट्रेलर लाँच केला. मात्र या ट्रेलरवरून शिवप्रेमी, काही संघटना आणि राजकीय नेते चांगलेच भडकलेले आहेत. इतिहासात नसलेल्या गोष्टी चित्रपटात अंतर्भुत केल्यामुळे शिवप्रेमींचा भडका उडालेला दिसतोय. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी तान्हाजीचे दिग्दर्शक ओम राऊत यांना वादग्रस्त दृश्ये बदलण्याची मागणी केली आहे.
- Advertisement -