- Advertisement -
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात व्यासपीठावरुन संभाषण करताना भीती व्यक्त केली आहे. चौथा स्तंभ कोसळण्यास वेळ लागणार नाही, असे वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे. प्रोपागंडा साहित्य निर्मितीमुळे निरंकुशतेला निमंत्रण मिळत असून, आपल्या देशातही वेगळा प्रोपागंडा पसरवला जात आहे, असे शरद पवार यांनी यावेळी सांगितले.
- Advertisement -