घरताज्या घडामोडीनव्या कृषी कायद्यांविरोधात विरोधकांकडून अपप्रचार

नव्या कृषी कायद्यांविरोधात विरोधकांकडून अपप्रचार

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी, कामगार वर्गाच्या विकासासाठी आणलेले नवे कायदे ऐतिहासिक आहेत. या कायद्यांविरोधात केवळ राजकीय हेतूने अपप्रचार सुरू आहे. भाजपा कार्यकर्त्यांनी जनतेत जाऊन या अपप्रचाराला चोख उत्तर दिले पाहिजे, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी गुरुवारी केले. भाजप प्रदेश कार्यसमिती बैठकीला मार्गदर्शन करताना नड्डा बोलत होते. 

नड्डा म्हणाले की, कोरोनाच्या प्रसार काळात देशातील आरोग्य यंत्रणेची स्थिती लक्षात घेता या महामारीचा प्रसार वेगाने होईल, असा अंदाज प्रगत राष्ट्रांनी व्यक्त केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनचा निर्णय वेळेवर घेऊन कोरोनाच्या प्रसाराला अटकाव केला. पाश्चात्य राष्ट्रांनी वर्तविलेले अंदाज खोटे ठरवले. भारताने केलेल्या उपाययोजनांची आता बड्या राष्ट्रांकडून प्रशंसा होत आहे. लॉकडाऊन काळात जाहीर केलेल्या आत्मनिर्भर पॅकेजद्वारे उद्योगपती, शेतकरी अशा समाजातील सर्वच वर्गांना विविध योजनांचा लाभ दिला जात आहे.

- Advertisement -

या योजनांची माहिती पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी, कार्यकर्त्यांनी सामान्य जनतेपर्यंत पोहचविली पाहिजे. मोदी सरकारने देशाच्या संरक्षणाशी कोणतीही तडजोड केली नाही. त्यामुळे गेल्या ६ वर्षांत चीनच्या सीमेवर रस्ते, पूल यांची विक्रमी वेळेत उभारणी झाली. चीन त्यामुळेच अस्वस्थ झाला आहे. आता भारत कोणत्याही दबावापुढे झुकणार नाही, हेच नरेंद्र मोदी यांनी दाखवून दिले आहे. नड्डा यांनी यावेळी गरीब कल्याणासाठी मोदी सरकारने सुरू केलेल्या योजनांचा आढावा घेतला.

महाराष्ट्रात आज सरकार नावाच्या व्यवस्था अस्तित्वात आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होतो आहे. सत्ताधारी पक्षात समन्वय नसल्याने कारभाराचा बोजवारा उडाला आहे. राज्य सरकारचे अपयश कार्यकर्त्यांनी जनतेसमोर मांडले पाहिजे. महाराष्ट्रातल्या जनतेने भाजपाला जनादेश दिला होता. मात्र, भाजपाचा नव्हे तर जनमताचा विश्वासघात करून हे सरकार सत्तेत आले आहे. आता महाराष्ट्रात निवडणुका झाल्या तर भाजप स्वबळावर सत्तेत येईल, असा विश्वासही नड्डा यांनी व्यक्त केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -