घरदेश-विदेशअतिरेक्यांना जिवंत पकडा आणि समस्या जाणून घ्या, काश्मीरमध्ये सुरक्षा दलांचा नवा फंडा

अतिरेक्यांना जिवंत पकडा आणि समस्या जाणून घ्या, काश्मीरमध्ये सुरक्षा दलांचा नवा फंडा

Subscribe

गेल्या सात महिन्यात ७० हून अधिक अतिरेक्यांचा खात्मा करणाऱ्या सुरक्षा दलाने आता अतिरेक्यांविरोधात नवा नारा दिला आहे. ’अतिरेक्यांना जीवंत पकडा आणि त्यांची समस्या जाणून घ्या’, असा नारा सुरक्षा दलाने दिला आहे. दहशतवादी संघटनांच्या गळाला लागलेल्या तरुण मुलांना या मार्गातून परावृत्त करण्यासाठी सुरक्षा दलाने हा नारा दिला आहे.
दहशतवादी संघटनांमध्ये नव्याने सामील होणाऱ्या तरुणांचे ब्रेनवॉश करून त्यांना त्यांच्या कुटुंबीयांच्या हवाली करण्यासाठी ही योजना आखण्यात आल्याचे सुरक्षा दलाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे दहशतवाद्यांचं नेटवर्क उदध्वस्त होण्यास मदतच होणार असल्याचेही मत त्यांनी मांडलं.

१५ ते १६ वर्षाची मुलेसुद्धा दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होतात. या कारवाई करताना मृत्यू येऊ शकतो याचे त्यांना भान नसते. त्यामुळे त्यांचा ब्रेशवॉश करणे गरजेचे आहे. म्हणूनच त्यांना जीवंत पकडून त्यांच्या समस्या जाणून घेण्यावर भर देण्यात येणार असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले. विशेष म्हणजे दहशतवादी संघटनांमध्ये सामील झालेल्या अनेक तरुणांना त्यातून बाहेर पडायचे असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. काही अतिरेक्यांनी तर आमच्याशी संपर्कही साधला आहे. त्यांना शिकायचे असून सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे आयुष्य जगायचे आहे. त्यामुळे त्यांना मदत करण्याचा निर्णय आम्ही घेतल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या सात महिन्यात चार अतिरेक्यांना जीवंत पकडण्यात आले आहे. त्यापैकी एकाला त्याच्या कुटुंबीयांकडे सोपविण्यात आल्याचं पोलीस महानिरीक्षक (काश्मीर रेंज) स्वयं प्रकाश पाणि यांनी सांगितले.

Priya Morehttps://www.mymahanagar.com/author/priya/
गेल्या ६ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहे. मला लिहायला, वाचायला आवडतेच पण त्यासोबतच मला नविन ठिकाणी फिरायला खूप आवडते. सध्या नविन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -