घरदेश-विदेशभविष्यातही जेडीयू मोदी सरकारमध्ये सहभागी होणार नाही

भविष्यातही जेडीयू मोदी सरकारमध्ये सहभागी होणार नाही

Subscribe

जनता दल संयुक्त(जेडीयू)नं मोदींच्या मंत्रिमंडळात सहभागी होण्यास नकार दिला आहे. भविष्यातही जेडीयू केंद्रातल्या मोदी सरकारमध्ये सहभागी होणार नसल्याचे पक्षाचे प्रवक्ते के. सी. त्यागी यांनी स्पष्ट केलं आहे. काही दिवसांपूर्वीच मोदी मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला. त्यादरम्यान नितीश कुमार यांचा जेडीयू पक्ष सरकारमध्ये सहभागी झालेला नाही. त्यांनी मोदी सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. मिडियाशी बोलताना नितीश कुमार म्हणाले की, अमित शाह यांनी बोलावल्यानंतर मी दिल्लीत दाखल झालो. त्यानंतर त्यांनी एनडीएच्या घटकपक्षांना एक-एक मंत्रिपद देत असल्याचे सांगितले. त्यावर मी म्हणालो, मंत्रिमंडळात नाममात्र प्रतिनिधित्व देण्याची गरज नाही. त्यानंतर जेडीयूच्या सर्वच खासदारांनी यावर सहमती दर्शवली आहे. नितीश कुमार हे मोदींच्या मंत्रिमंडळात सहभागी न झाल्यानं बिहारमधल्या राजकीय परिस्थितीसंदर्भात नव्याच चर्चा आता सुरू झाल्या आहेत.

त्यानंतर आता जेडीयूनेही बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी तीव्र केली आहे.काश्मीरमध्ये संविधानातील कलम 370 हटवणे, अयोध्येतील राम मंदिर निर्माण, तिहेरी तलाक आणि समान नागरी कायदा या सर्वच मुद्द्यांवर जेडीयूचे भाजपापेक्षा वेगळे मत आहे. मोदी कॅबिनेटमध्ये जेडीयूने सहभागी न होणे आणि बिहारमधल्या नितीश कॅबिनेटमध्ये भाजपाला एकही मंत्रिपद देण्यात न आल्याने आता भाजपा-जेडीयूतली धुसफूस चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे. तसेच केंद्रीय मंत्रिमंडळात जेडीयूला सहभागी करून न घेतल्याने आम्ही नाराज किंवा असंतुष्ट असल्याची चर्चा निरर्थक असल्याचंही त्यागी म्हणाले आहेत.जदयूच्याच मंत्र्यांना शपथ देण्याबाबत केंद्र सरकारवरील नाराजी असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपाच्या कोट्यातून आधीच मंत्री बनविण्यात आले आहेत. जी खाती रिकामी आहेत ती जदयूची आहेत, असे स्पष्टीकरण जदयूने दिले आहे. मात्र, केंद्रीय मंत्रिपद आणि मोदी सरकारमध्ये जदयू सहभागी न झाल्याने बिहारमधील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे. बिहार कॅबिनेट विस्ताराद्वारे नितीशकुमार दलित आणि मागासलेल्या मतदारांमध्ये आपली पकड अधिक मजबूत करण्याची खेळी खेळू शकतात. राज्यात 50 टक्क्यांपेक्षा अधिक मागासलेल्या समाजांची मते आहेत. पुढील वर्षाच्या अखेरीस बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. यामुळे पक्ष याकडे लक्ष केंद्रित करणार आहे. तसेच प्रलंबित असलेले प्रकल्पही जलदगतीने पूर्ण करणार आहे.

- Advertisement -

बिहार मंत्रीमंडळ विस्तार भाजपला मात्र स्थान नाही

जनता दलने (संयुक्त) नरेंद्र मोदी सरकारमध्ये सहभागी होण्यास नकार दिल्यानंतर तीनच दिवसांत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी रविवारी आपल्या मंत्रीमंडळाचा विस्तार केला. त्याअंतर्गत आठ नव्या चेहर्‍यांना मंत्रीमंडळात समावून घेतले. मात्र त्यात जनता दलाचे मित्र पक्ष भाजप आणि पासवान यांचा लोक जनशक्ती पक्षाला स्थान देणअयात आलेले नाही. या दोन्ही पक्षांचा बिहार मंत्रीमंडळात हिस्सा आहे. मात्र तरीही त्यांना स्थान देण्यात आलेले नाही.

याबाबत पत्रकारांशी बोलताना नितीशकुमार म्हणाले की, आम्ही भाजपला मंत्रीमंडळात स्थान देण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी आता लगेचच भाजपपैकी कोणालाही मंत्रीमंडळात घेण्यास इन्कार केला. जनता दल आणि भाजपमध्ये सर्व काही आलबेल आहे, असेही नितीशकुमार यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. जनता दल (सं) च्या कोटामधून मंत्रीमंडळात काही जागा भरायच्या होत्या. म्हणून आम्ही काहीजणांना स्थान दिले. भाजपसोबत कोणतीही समस्या नाही. दोन्ही पक्षांमध्ये सर्वकाही सुरळीत आहे, असेही नितीश कुमार म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -