पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वात मोठ्या हॅकथॉनच्या ग्रँड फिनालेला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करत आहेत. या त्यांनी विद्यार्थ्यांना उद्देशीन म्हटले की, या कठिण परिस्थितीमध्येही प्रयोगशील राहणे हे आव्हानात्मक आहे. ज्या आव्हानांचा तुम्ही सामना करता आहात, ते जाणून घेण्याची मला उत्सुकता आहे. पंतप्रधान पुढे म्हणाले की, आपल्या सोयी-सुविधा अधिक प्रभावी, इंटरॅक्टीव्ह आणि लोकांसाठी उपयुक्त बनवण्यासाठी आर्टिफिशिअल इंटेलिजेंस ही सुसह्य होऊ शकते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना म्हटले की, आजच्या तरुण पिढीचे देशाच्या विकासात मोठे योगदान आहे. ही पिढी डेटा – संचालित समाधानासोबतच हेल्थकेअर समाधानातही मोठा बदल करत आहेत. गरीब वस्त्यांमध्ये यामुळे स्वस्त दरात आरोग्य सेवा मिळत आहे. केंद्र सरकारचा आयुष्मान भारतच्या माध्यमातून हाच उद्देश आहे.
National Education Policy 2020 announced recently has been framed keeping in mind the aspirations of the youth of 21st century of our country: Prime Minister Narendra Modi while addressing students participating in the Smart India Hackathon 2020 pic.twitter.com/ztweoTjC8Z
— ANI (@ANI) August 1, 2020
पुढे पंतप्रधान म्हणाले की, महिलांच्या स्वच्छतेचे महत्त्व खुप उशीराने पटले. गेल्या सहा वर्षात महिला या दृष्टीने प्रयत्न करत आहेत. या संबंधीत नरेंद्र मोदी यांनी आधी ट्विट करत म्हटले की, स्मार्ट इंडिया हॅकथॉन आयडिया आणि आविष्कारचे जीवंत फोरम उभे राहिले आहे. या माध्यमातून आपले तरूण नवनवीन संशोधनात कोरोनाच्यानंतरच्या विकासासाठी काम करत आहेत. तसेच आत्मनिर्भर भारतावरही लक्षकेंद्रीत करत आहेत.
Interacting with our bright young minds at the Smart India Hackathon. https://t.co/QTx5haooWN
— Narendra Modi (@narendramodi) August 1, 2020