घरदेश-विदेशदहशतवादी हल्ल्यावर काय म्हणाले होते मोदी?; नेटिझन्सने करुन दिली आठवण

दहशतवादी हल्ल्यावर काय म्हणाले होते मोदी?; नेटिझन्सने करुन दिली आठवण

Subscribe

पुलवामा दहशतवादी हल्लयानंतर दहशतवादी हल्लयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभांमध्ये काय म्हणाले होते? याचा छोटासा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी २०१२ मध्ये जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा ते अतिरेकी हल्ल्यासंदर्भात काय म्हणाले होते? याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यावेळी त्यांनी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना अतिरेकी हल्ल्यासंदर्भात प्रश्न विचारला होता. त्याचबरोबर २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभांमध्ये आपण पाकिस्तानला कशाप्रकारे उत्तर देऊ? याविषयी त्यांनी प्रतिक्रिया दिली होती. काल पुलवामा येथे घडलेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नेटीझन्सनी मोदींच्या २०१२ आणि २०१४ च्या प्रचारसभांमधील भाषणांची आठवण करुन दिली आहे. मोदींचे हे व्हिडिओ सध्या ट्विटर आणि फेसबुकवर प्रचंड व्हायरल होत आहेत.

वरील व्हिडिओ भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत युट्यूब चॅनलवरुन प्रदर्शित करण्यात आला होता. या भाषणातला एक छोटासा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते तत्कालीन देशाचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दहशतवादाविषयी प्रश्न विचारत आहेत.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -