अनेकदा जेवण करताना गृहिणींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अशावेळी खास किचन टिप्स लक्षात असल्यास त्याचा चांगलाच फायदा होतो.
- भजीच्या पीठामध्ये मक्याचे पीठ घातल्याने भजी कुरकुरीत होतात.
- शेंगदाणे भाजून झाल्यावर त्यात मीठ टाकल्याने साल लवकर निघतात.
- पालेभाज्या सुकल्यावर पाण्यात व्हिनेगर किंवा लिंबाचा रस घालून ठेवल्यास भाज्या ताज्या होतात.
- कच्ची केळी ठंड पाण्यात ठेवल्याने आठवडाभर टवटवीत राहतात.
- फळभाज्या मऊ किंवा शिळ्या झाल्यास रात्रभर मिळाच्या पाण्यात घालून ठेवल्याने टवटवीत राहण्यास मदत होते.
- कडुनिंब शिल्लक असल्यास तो तळून डब्यात भरुन ठेवल्याने जास्त काळ टिकतो.
- लिंबाच्या रसाचे डाग घालवण्यासाठी त्यावर आल्याचा तुकडा घासावा.
- पुऱ्यांच्या कणकेत साखर घातली तर पुऱ्या बराच वेळ फुगलेल्या राहतात.
- भेंडीची भाजी करताना त्यात दही घातल्याने भाजी चिकट होत नाही.
- भाज्यांमध्ये मीठ शेवटी घातल्यास भाजीतले मीठ टिकून राहते.
- डाळ किंवा तांदळामध्ये कडूनिंब घातल्यास त्याला किड लागत नाही.
- तुरीच्या डाळीत हिंग ठेवल्यास हिंगाचा वास टिकून राहतो.
- तांदूळ पाण्यात भिजवून ठेवला तर तांदळाचा दाणा मोकळा आणि मोठा होतो.
- जास्त लिंबाच्या रसासाठी पाच ते सहा मिनिटे लिंबू कोमट पाण्याच भिजवावे.
- सुकं खोबरं तुरडाळीच ठेवले तर खराब होत नाही.