घरलाईफस्टाईलसावधान! गोड पेय पदार्थांमुळेही वाढतेय वजन

सावधान! गोड पेय पदार्थांमुळेही वाढतेय वजन

Subscribe

पेय पदार्थांमध्ये वरून साखर घालून पिणे टाळा.

हल्ली आपण गोड पदार्थ खाल्यामुळे वजन वाढल्याचे ऐकलं आहेत. पण तुम्ही गोड पेयामुळे वजन वाढते हे ऐकलं आहे का? मात्र हे विधान खरं आहे. अलीकडेच एका अध्ययनानुसार समोर आले आहे की, गोड पेय पिण्याने वजन वाढते. हे पेयात टाकलेल्या जास्त साखरेमुळे होत असल्याचे सांगितलं गेलं आहे.

पाण्यात साखर घालून पिणाऱ्यांचे शुगर प्रमाणात वाढ 

जगभरात पेय पदार्थांमुळे लठ्ठपणाची समस्या वाढत आहे, असं युके आणि चायनाच्या वैज्ञानिकांनी केलेल्या शोधामुळे समोर आलं आहे. या शोधात भोजनाच्या प्रकाराने वजनावर प्रभाव पडतो का? यावर शोध घेतला आहे. या शोधातून असं निदर्शनास आलं आहे की, पाण्यात साखर घालून पिणाऱ्यांचे शुगर प्रमाण हे अधिक वाढतं आहे. तर साखरेचं तेवढं प्रमाण ठोस पदार्थाद्वारे दिल्याने शुगर लेवलमध्ये वाढ होत नसल्याचे समोर आलं आहे.

- Advertisement -

या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नये 

जर आपल्याला गोड खाण्याची जास्त आवड असेल तर आपल्याला लिक्विड डायटवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. लिक्विड डायटमुळे आपलं वजन लवकर वाढून शरीराचा आकार बिघडत जाईल. हल्ली कॉफी, कोल्ड ड्रिंक्स, इतर शेक पिण्याचं ट्रेंड सुरू असल्यामुळे कमी डायट असले तरी वजन काही कमी होत नाहीये म्हणून या गोष्टींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

कॅफीन शरीरासाठी धोकादायक 

दिवसातून जास्त वेळा चहा, कॉफीचे सेवन करू नये. कारण यामध्ये कॅफीन असतं जे आपल्या शरीरासाठी धोकादायक ठरू शकतं. तसंच कोल्ड ड्रिंक्स, लिंबू सरबत आणि सोडा यामध्ये देखील शुगरचे अधिक प्रमाण असते. त्यामुळे हे पेय सेवन करणे टाळावे.

- Advertisement -

किडनी, हार्ट आणि लिव्हरवर वाईट परिणाम

या गोड पेय पदार्थांमुळे शरीरात शुगरचे प्रमाण वाढते आणि किडनी, हार्ट आणि लिव्हरवर वाईट परिणाम होतो. त्यामुळे पेय पदार्थांमध्ये वरून साखर घालून पिणे टाळा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -