घरमहाराष्ट्रपंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांवर काळाचा घाला; टेम्पोच्या भीषण अपघातात ५ जणांचा मृत्यू

पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांवर काळाचा घाला; टेम्पोच्या भीषण अपघातात ५ जणांचा मृत्यू

Subscribe

पंढरपूर येथील सांगोल्याजवळ वारकऱ्यांना घेऊन जाणाऱ्या टेम्पोचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामध्ये बेळगावच्या मडोळीचे ४ आणि हंगरगा या गावाचा १ वारकारीचा मृत्यू झाला आहे. तर दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. टेम्पेला समोरच्या माणसाने धडक दिल्याने हा अपघात घडला.

दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशी निमित्ताने बेळगाव आणि आजूबाजूच्या परिसरातील शेकडो वारकरी पंढरपूरला जातात. त्याचप्रमाणे बेळगाव येथील मडोळी आणि हंगरगा येथून गुरुवारी दुपारी पंढरपूरला जाण्यासाठी काही वारकरी निघाले होते. पंढरपूरला जाण्यासाठी त्यांनी एक टेम्पो भाड्याने घेतला होता आणि त्या टेम्पोमार्फत ते पंढरपूरला निघाले होते. सकाळी चार वाजेच्या सुमारास एका मालवाहू ट्रॅक्टरने टेम्पोला जोरदार धडक दिली. या धडकेत पाच वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला तर दोन वारकऱ्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेची माहिती मडोळी आणि हंगरगा गावच्या गावकऱ्यांना देण्यात आली आहे. ते मृतदेह ताब्यात घेण्यासाठी आणि इतर जखमी गावकऱ्यांसाठी गावकरी निघाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -