मुंबई विद्यापीठाच्या २०१९ च्या तृतीय वर्ष बी.एस्सी, सत्र ६ ची परीक्षा २५ एप्रिल पासून सुरु होत असून ती १० मे २०१९ पर्यंत चालणार आहे. या परीक्षेस ९४१६ विद्यार्थीं बसणार आहेत. तर बी-एस्सीची परिक्षा सात जिल्ह्यातील १२५ परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहेत. तसेच हि परीक्षा यशस्वीपणे पारपाडण्यासाठी परीक्षा विभाग सज्ज झाला आहे. बी-एस्सीच्या परिक्षेमधील सुधारित अभ्यासक्रमामध्ये एकूण ९४१६ विद्यार्थी परीक्षेत बसणार आहेत. तर या परीक्षेमध्ये मुलींची संख्या लक्षणीय आहे. या परिक्षेत ५६३७ विद्यार्थीनी तर ३७७९ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. तसेच बी-एस्सी परीक्षेमध्ये सर्वात जास्त विद्यार्थी ठाणे जिल्ह्यातून बसणार असून, याच जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजेच १७३३ मुली परीक्षेस बसणार आहेत. सदर परीक्षा मुंबईसह, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर या जिल्ह्यातील आणि महाराष्ट्राबाहेरील दादरा नगर हवेली येथील एका केंद्रासह एकूण १२५ परीक्षा केंद्रावर बी-एस्सी सत्र ६ ची परीक्षा घेतली जाणार आहेत.
बी.एस्सी सत्र ६ चा सुधारित अभ्यासक्रम
२०१९-२० या शैक्षणिक वर्षापासून बी.एस्सी या अभ्यासक्रमाची पुनर्रचना करण्यात आली आहे. तसेच अभ्यासक्रमदेखील सुधारित करण्यात आलेला आहे. या तृतीय वर्ष बी.एस्सी सत्र ६ च्या परीक्षेमध्ये एकूण १५ विषय आहेत. तसेच परीक्षेचा कालावधी ३ तासांचा असून ही परीक्षा सकाळी १०.३० वाजता सुरु होणार आहे. तर दुपारी १.३० वाजता संपणार आहे. बी-एस्सी सत्र ६ च्या परीक्षेसाठी परीक्षा विभागातील हस्तलिखित विभाग, परीक्षा आणि निकाल विभाग, कॅप विभाग आणि संगणक विभागातील अधिकारी यासर्व कर्मचाऱ्यांनी तयारी केली आहे. परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी या परीक्षेच्या सज्जतेचा आढावा घेतला. यावेळी परीक्षा वेळेवर सुरुकरुन, परीक्षांचे निकाल वेळेवर जाहीर करण्यास विद्यापीठाचे प्राधान्य राहील, असा विश्वास डॉ. विनोद पाटील यांनी व्यक्त केला आहे.
बी.एस्सी परीक्षेला बसणारे जिल्हानिहाय विद्यार्थी
जिल्हा विद्यार्थिनी विद्यार्थी एकूण
मुंबई शहर १२२६ ७३८ १९६४
मुंबई उपनगर ७२३ ३६७ १०९०
ठाणे १७३३ १०९७ २८३०
रायगड ९४९ ८०५ १७५४
रत्नागिरी ४४२ ३४९ ७९१
सिंधूदुर्ग २७२ १७० ४४२
पालघर २७९ २४७ ५२६
दादरा आणि नगर हवेली १३ ६ १९
एकूण ५,६३७ ३,७७९ ९,४१६