घरमुंबईविषारी केमिकल पाण्यात सोडणाऱ्या दोघांना अटक

विषारी केमिकल पाण्यात सोडणाऱ्या दोघांना अटक

Subscribe

भिवंडीत टायर कंपनीतून प्रक्रिया केलेले विषारी केमिकल मीठपाडा नदीत सोडल्यामुळे दोघांना अटक करण्यात आली आहे.

भिवंडीत टायर कंपनीतून प्रक्रिया केलेले विषारी केमिकल शेलार (मीठपाडा) येथील कामवारी नदीच्या नाल्यात सोडून प्रदूषण केल्याने दोघांना अटक करण्यात आली आहे. ट्रकचालक मोहम्मद अयुब खान (४५) आणि त्याचा साथीदार चंद्रप्रकाश यादव (३५) अशी आरोपींची नावे असून त्यांना केमिकल प्रदूषण प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

नेमके काय घडले?

वाडा तालुक्यातील मौजे डाकिवली येथील सन रबर या टायर कंपनी व्यवस्थापनाच्या निर्देशाने गेल्या अनेक महिन्यांपासून टायरवर प्रक्रिया केलेले घातक केमिकल ट्रकचालक टँकरमध्ये भरून ते मीठपाडा येथील नाल्यात रात्रीच्या वेळेत सोडत होता. त्यासाठी पानपट्टी चालक चंद्रप्रकाश हा काही पैशांच्या मोबदल्यात त्याला मदत करीत होता. मात्र, सोमवारी रात्री केमिकलने भरलेला टँकर नाल्यात खाली करीत असताना परिसरात दुर्गंधी पसरून नागरिकांच्या घशाला खवखव आणि श्वसनाला त्रास होऊ लागला. त्यामुळे नागरिकांनी या केमिकलयुक्त घटनेचा शोध घेतला असता मीठपाडा येथील तबेल्यालगतच्या नाल्यात घातक केमिकलने भरलेला टँकर खाली करीत असल्याचे दिसून आले. भयभीत झालेल्या नागरिकांनी या घटनेची खबर तात्काळ तालुका पोलिसांना दिली. या घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक वैभव देशपांडे यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेऊन केमिकलने भरलेला टँकर ताब्यात घेऊन चालक मोहम्मद अयुब खान आणि त्याचा साथीदार चंद्रप्रकाश यादव यांना अटक केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मोहम्मद शमीच्या अटक वॉरंटला स्थगिती


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -