घरमहाराष्ट्रसायबर हल्ला होईलच कसा? आपण अजूनही मॅन्युअली ऑपरेट करतो

सायबर हल्ला होईलच कसा? आपण अजूनही मॅन्युअली ऑपरेट करतो

Subscribe

मुंबईतील वीज यंत्रणेवर 12 ऑक्टोबर रोजी चीनने सायबर हल्ला झाला होता, असा दावा ऊर्जा आणि गृह विभागाच्या एका अहवालात करण्यात आला. परंतु तरी तो धादांत खोटा असून वीज वितरण प्रणालीचे अद्याप शंभर टक्के संगणकीकरण झालेले नाही. आपण अजूनही मॅन्युअली ऑपरेट करतो, असे आरोप माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहेत. आपले अपयश लपवण्यासाठी दोन्ही मंत्र्यांनी हे खोटे अहवाल एका आयपीएस अधिकार्‍याकडून तयार करून घेत राज्याच्या 12 कोटी जनतेची दिशाभूल केली, असा आरोपही बावनकुळे यांनी केला आहे.

12 ऑक्टोबरच्या तीन दिवस आधीच मुंबईला वीज पुरवठा करणार्‍या चार पैकी दोन लाईन्समध्ये बिघाड झाला होता. त्याकडे ऊर्जा विभागाच्या अधिकार्‍यांनी वेळीच लक्ष दिले नाही, म्हणून मुंबईला वीज पुरवठा करणार्‍या उर्वरित दोन लाईनवर दबाव वाढून त्याही बंद पडल्या. जर 12 ऑक्टोबरच्या आधी तीन दिवस ऊर्जा विभागाने लक्ष घातले असते तर मुंबईत वीज पुरवठा दिवसभर बंद पडला नसता असेही बावनकुळे म्हणाले.

- Advertisement -

महाराष्ट्राच्या वीज वितरण व्यवस्थेवर सायबर हल्ला होणे शक्यच नाही. कारण आपण अजूनही मॅन्युअली ऑपरेट करत आहोत, असे सांगत चंद्रशेखर बावनकुळे यांनी या सर्व प्रकारची केंद्र सरकारने चौकशी करावी, अशी मागणी केली. विद्यमान ऊर्जा मंत्र्यांना शेतकर्‍यांचे वीज कनेक्शन कापण्याचे विषय, वीज बिल माफीबद्दलचे मुद्दे यावर बोलायचे नाही म्हणून एका आयपीएस अधिकार्‍याकडून खोटा अहवाल तयार करून त्यांनी विधिमंडळाची दिशाभूल केल्याचे बावनकुळे म्हणाले.

दरम्यान, मुंबईच्या वीज वितरण प्रणालीवर चीनने सायबर हल्ला केल्याचे समोर आल्यानंतर ऊर्जा विभागाने केंद्र सरकारच्या परराष्ट्र विभागाला का कळवले नाही, असा सवालही चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -