मुंबईतील कोरोनाच्या रुग्णांनी तब्बल ६ हजरांचा टप्पा पार केला आहे. मुंबईत रुग्णसंख्येचा दिवसेंदिवस उद्रेक होत आहे. मुंबईत आज ६ हजार ९२३ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर मुंबईत आज ३ हजार ३२० रुग्ण बरे होऊन सुखरुपणे घरी परतले आहेत. मुंबईत सध्या ४५ हजार १४० अँक्टिव रुग्ण आहेत. मुंबईत आज ८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आज एकूण ४६ हजार ४५० कोरोना चाचण्या करण्यात आल्या. मुंबईत आतापर्यंत ३ लाख ९८ हजार ६३४ कोरोबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर आतापर्यंत मुंबईत ३ लाख ४० हजार ९३५ कोरोनारुग्ण बरे झाले आहेत. त्याचप्रमाणे मुंबईत आतापर्यंत ११ हजार ६४९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईत आतापर्यंत ३९ लाख ८३ हजार ३८० कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.
#CoronavirusUpdates
२८ मार्च, संध्या. ६:०० वाजता#कोरोना_ला_ना #NaToCorona pic.twitter.com/lbxGcafZgb— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) March 28, 2021
मुंबूईत कोरोना रुग्णांचा दर हा ८६ टक्के इतका आहे. २१ मार्च ते २७ मार्च पर्यंतचा विचार केला असता कोरोना रुग्णवाढीचा दर हा १.१७ टक्के इतका आहे. मुंबईत सध्या ५७ सक्रिय कटेंनमेन झोन आहेत. तर ५६९ सक्रिय सीलबंद इमारती आहेत.
#CoronavirusUpdates
28-Mar, 6:00pm#NaToCorona pic.twitter.com/2eMoIx3ILz— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) March 28, 2021
मुंबईत कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर आळा घालण्यासाठी रविवारपासून रात्रीची संचार बंदी जाहिर केली आहे. मुंबईसह राज्यात रात्रीची संचार बंदी असणार आहे. कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्यास त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. मिशन बिगीनच्या अंतर्गत महाराष्ट्र शासनाने नवी नियमावली जाहिर केली आहे. त्याचप्रमाणे होळी आणि रंगपंचमी साजरी करण्यावरही कडक निर्बंध लागू केले आहे.