भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्यावहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्याला शुक्रवारपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेला कसोटी क्रिकेटमधील ‘वर्ल्डकप’ असे संबोधले जात आहे. त्यामुळे दोन्ही संघांचा हा सामना जिंकत साधारण १२ कोटी रुपयांचे रोख बक्षीस आणि अजिंक्यपदाची गदा मिळवण्याचा प्रयत्न असेल. विराट कोहलीचा भारतीय संघ संतुलित असून या संघात मॅचविनर आणि अनुभवी खेळाडूंची भरणा आहे. भारताला सरावाची फारशी संधी मिळालेली नसली तरी अंतिम सामन्यात कोहलीचा संघ सर्वोत्तम खेळ करेल याची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुलीला खात्री आहे.
मागील दोन वर्षांत खूप मेहनत घेतली
आम्हा सर्वांसाठीच हा खूप मोठा क्षण आहे. मी भारतीय संघाला अंतिम सामन्यासाठी शुभेच्छा देतो. जागतिक कसोटी स्पर्धेच्या अंतिम सामन्यापर्यंतची मजल मारण्यासा
कोहलीचे असेल दमदार कामगिरीचे लक्ष्य
विराट कोहलीला भारताचा कर्णधार म्हणून अजून आयसीसीची एकही स्पर्धा जिंकता आलेली नाही. त्यामुळे या सामन्यात दमदार कामगिरी करण्याचे कोहलीचे लक्ष्य असेल असे गांगुलीला वाटते. प्रत्येकासाठीच ही एक संधी आहे. कोहली उत्कृष्ट खेळाडू आहे आणि तो या अंतिम सामन्यात अविश्वसनीय कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल याची मला खात्री असल्याचे गांगुलीने सांगितले.