घरक्राइमसुहागरातमध्ये असे काही घडले की, नवरा-बायको रुग्णालयात झाले दाखल

सुहागरातमध्ये असे काही घडले की, नवरा-बायको रुग्णालयात झाले दाखल

Subscribe

बिहारमधील गोपालगंज जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. लव्ह मॅरेज करणाऱ्या एका जोडप्याने सुहागरातच्या रात्री आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. सात फेऱ्या घेतल्यानंतर जोडप्याने विष प्राशन केले असून गंभीर परिस्थितीत जोडप्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पण तिथून त्यांना गोरखपूर येथे हलवण्यात आले आहे. मीरगंज पोलीस स्टेशन परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे.

पोलिसांना जोडप्याच्या नातेवाईकांनी सांगितले की, शनिवारी मंदिरात जमशेदपूरच्या सोनाटे ठाणे परिसरात राहणारी २८ वर्षी शांती देवी आणि गोपालगंजमधील मीरगंज शहरातील ३० वर्षी मुकेश कुमार सिंहसोबत लग्न केले. लग्नानंतर त्यांनी रविवार घरी सर्वांसाठी जेवणाचा कार्यक्रम ठेवला होता.

- Advertisement -

सर्व नातेवाईकांचा जेवणाचा कार्यक्रम झाल्यानंतर नवरा-बायको झोपायला गेले. यानंतर जोडप्याने विष प्राशन केले. पण जोडप्याला रुग्णालयात घेऊन आलेल्या नातेवाईकांनी सांगितले की, दोघांनी विष घातलेले चिकन खाल्ले होते. पण विष प्राशन करण्यामागचे कारण काय आहे? याबाबत अद्याप माहिती समोर आली नाही आहे.

माहितीनुसार, दोघं खोलीत बेशुद्ध अवस्थेत आढळले होते. त्यानंतर नातेवाईकांनी तातडीने त्यांना रुग्णालयात घेऊन गेले. आपात्कालीन वार्डमध्ये डॉक्टरांनी दोघांवर उपचार केले. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. पोलिसांनी याबाबत सांगितले की, याप्रकरणाचा तपास सुरू आहे. प्रेमी जोडपे बेशुद्ध अवस्थेत आहेत. त्यामुळे चौकशी होत नाही आहे.

- Advertisement -

हेही वाचा – अजब प्रेमाची गजब कहाणी! २८ वर्ष लिव्ह इन, साठी ओलांडल्यानंतर लग्न


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -