घरफिचर्सप्रतिभावंत दिग्दर्शक व्ही. शांताराम

प्रतिभावंत दिग्दर्शक व्ही. शांताराम

Subscribe

व्ही. शांताराम हे भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रतिभावंत निर्माता, दिग्दर्शक, नट व पटकथाकार. त्यांचे संपूर्ण नाव शांताराम राजाराम वणकुद्रे. त्यांचा जन्म 18 नोव्हेंबर रोजी कोल्हापूर येथे झाला. त्यांच्या वडिलांचे किराणा मालाचे दुकान होते व कुटुंबाची आर्थिक स्थिती यथातथाच होती. त्यामुळे शालेय शिक्षण झाल्यावर सुरुवातीला त्यांनी अल्प वेतनावर नोकरी केली. अशा प्रतिकूल काळातच ते दादासाहेब फाळके यांचे चित्रपट, बालगंधर्वांची नाटके, भारतीय व पाश्चात्त्य संगीत अशा कलाक्षेत्रांकडे आकर्षित झाले आणि परिश्रम, कल्पकता व स्वयंप्रेरणा यांच्या बळावर शिकत जाऊन श्रेष्ठ दिग्दर्शक बनले. १९१४ साली त्यांनी बालगंधर्वांच्या ‘गंधर्व नाटक मंडळी’त नट म्हणून प्रवेश केला. १९२० साली फाळके यांच्या पौराणिक मूकपटांच्या यशाने प्रेरित होऊन कोल्हापूरला प्रसिद्ध चित्रकार बाबूराव पेंटर यांनी स्थापलेल्या ‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’त ते सामील झाले.

नेपथ्य, छायाचित्रण, संकलन, अभिनय, खास दृश्ये (स्पेशल इफेक्ट्स) अशा प्रत्येक शाखेतील बारकावे व्ही. शांताराम यांनी तेथे अभ्यासले. याच कंपनीत असताना बाबूराव पेंढारकर यांनी त्यांचे ‘व्ही. शांताराम’ असे चित्रपटीय नामकरण केले. महाराष्ट्र फिल्म कंपनीने त्या काळात अनेक मूकपट काढले. त्यांपैकी सुरेखाहरण (१९२१) या पौराणिक मूकपटातील कृष्णाच्या भूमिकेद्वारे त्यांनी रुपेरी पडद्यावर प्रवेश केला. विशेषतः सावकारी पाश (१९२५) या सामाजिक वास्तवाचे अत्यंत प्रभावी चित्रण करणार्‍या मूकपटाचा शांतारामबापूंवर सखोल परिणाम झाला.

- Advertisement -

१९२९ साली कोल्हापूर येथे प्रभात फिल्म कंपनीची स्थापना झाली. या नव्या कंपनीमुळे भारतीय चित्रपटसृष्टीत एका सुवर्णयुगाला प्रारंभ झाला. या कंपनीने व्ही. शांताराम यांच्या दिग्दर्शनाखाली गोपाळकृष्ण (१९२९), खुनी खंजर (१९३०), रानीसाहिबा (१९३०), उदयकाल (१९३०), जुलूम (१९३१), चंद्रसेना (१९३१) इ. पौराणिक व देमार (स्टंट) मूकपट निर्माण केले. १९३२ साली अयोध्येचा राजा हा मराठी (हिंदी अयोध्याका राजा) पहिला बोलपट निर्माण करण्यात आला. त्याचे संगीतदिग्दर्शक गोविंदराव टेंबे होते व प्रमुख भूमिका दुर्गा खोटे, बाबूराव पेंढारकर, मास्टर विनायक इ. नामवंत अभिनेत्यांनी केल्या होत्या. या बोलपटातील इंद्रदरबाराचे नेपथ्य अतिशय नेत्रदीपक होते.

शांताराम दिग्दर्शित चंद्रसेना हा पौराणिक चित्रपट (१९३५) मराठी, हिंदी, तमिळ अशा तीन भाषांत होता. सागरी वातावरणाची भव्य कलात्मक दृश्ये हे या चित्रपटाचे खास वैशिष्ठ्य होय. अपना देश (हिंदी, १९४९; तेलुगूमध्ये नमनाडू), दहेज (हिंदी, १९५०), अमर भूपाळी (मराठी, १९५१), परछाई (हिंदी, १९५२), तीन बत्ती चार रास्ता (हिंदी, १९५३), सुबह का तारा (हिंदी, १९५३), सुरंग (१९५३), झनक झनक पायल बाजे (हिंदी, १९५५), तुफान और दिया (हिंदी, १९५६), दो आँखे बारह हाथ (हिंदी, १९५७), हे काही उल्लेखनीय चित्रपट शांताराम यांनी दिग्दर्शित केले. अशा या प्रतिभावंत दिग्दर्शकाचे ३० ऑक्टोबर १९९० रोजी निधन झाले.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -