राज्यात गेल्या दोन-तीन दिवसांत अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला होता. त्यामुळे शेतातील उभी पिके या पावसामुळे जमीनदोस्त झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. या शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याच्या मागणीवरून विधान भवनात विरोधक आक्रमक झाले होते.
- Advertisement -
शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधी पक्षाच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले.
- Advertisement -
अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले, याबाबतचा प्रस्ताव महाविकास आघाडीच्यावतीने विधानसभेत मांडण्यात आला होता, मात्र तो नाकारण्यात आला. त्यामुळे विरोधक आक्रमक झाले.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर महाविकास आघाडीने विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.