माजी खासदार आणि भाजप नेते नारायण राणे यांचे सुपूत्र निलेश राणे यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत त्यांना ट्विटरच्या माध्यामातून माहिती दिली आहे.
कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसल्याने चाचणी केली असता माझा कोविड-19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझी तब्ब्येत उत्तम असून डॉक्टरांच्या सल्ल्याने मी स्वतःला सेल्फ क्वारंटाईन करून घेतले आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींनी स्वत:ची चाचणी करावी.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) August 16, 2020
धारावीत आज ५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे धारावीत कोरोनाबाधितांचा आकडा २ हजार ६६८वर पोहोचला आहे, अशी माहिती महापालिकेने दिली आहे.
5 new #COVID19 positive cases have been reported in Dharavi area of Mumbai today, taking the total number of cases to 2668: Brihanmumbai Municipal Corporation (BMC)
— ANI (@ANI) August 16, 2020
देशात १५ ऑगस्ट पर्यंत २ कोटी ९३ लाख ९ हजार ७०३ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या असून यापैकी काल दिवसभरात ७ लाख ४६ हजार ६०८ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत, अशी माहिती आयसीएमआरने दिली आहे.
2,93,09,703 samples tested up to 15th August for #COVID19. Of these, 7,46,608 samples were tested yesterday: Indian Council of Medical Research (ICMR) pic.twitter.com/5K6RLnWEu8
— ANI (@ANI) August 16, 2020
देशात गेल्या २४ तासांत ६३ हजार ४८९ कोरोनाबाधित नवे रुग्ण आढळले असून ९४४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झील आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा २५ लाख ८९ हजार ६८२वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत ४९ हजार ९८० रुग्णांचा मृत्यू झाला असून १८ लाख ६२ हजार २५८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या ६ लाख ७७ हजार ४४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
Spike of 63,489 cases and 944 deaths reported in India, in the last 24 hours.
The #COVID19 tally in the country rises to 25,89,682 including 6,77,444 active cases, 18,62,258 discharged & 49,980 deaths: Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/55ZQrgdo0P
— ANI (@ANI) August 16, 2020
औरंगाबाद कोरोनामुळे १४ वर्षीय मुलीचा मृत्यू .घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू. 9 ऑगस्टला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. काल संध्याकाळी सहा वाजता मृत्यू झाला. औरंगाबादमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींची संख्या ५७९ वर पोहचली आहे.
गेल्या चोवीस तासांत देशात कोरोनाच्या ६५ हजार रुग्णांचे निदान झाले, तर ९९६ रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील कोरोना रुग्णांची संख्या २५ लाख २६ हजार १९२ वर पोहोचली आहे. देशात आत्तापर्यंत ४९ हजार ३६ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.