घरक्राइमMurder: 'तिच्यासाठी' 'ती' मुलगा बनली अन् ठेवला लग्नाचा प्रस्ताव; नकार देताच...

Murder: ‘तिच्यासाठी’ ‘ती’ मुलगा बनली अन् ठेवला लग्नाचा प्रस्ताव; नकार देताच…

Subscribe

नंदिनी या 25 वर्षीय अभियंता मुलीची चेन्नईमध्ये वेट्रीमारन या ट्रान्समॅनने हत्या केली आहे. ट्रान्समनने प्रथम मुलीला साखळीने बांधले. त्यानंतर तिच्या मानेवर, हातावर आणि पायावर ब्लेडने वार करण्यात आले. एवढं करूनही तो थांबला नाही, तर त्याने तिला जिवंत जाळूनही टाकले. सध्या या कृत्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

चेन्नई : तामिळनाडू येथून एक हृदयचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. येथे एका ट्रान्समॅनने (लिंग बदलेला तरुण) त्याच्या प्रेयसीची निर्घृण हत्या केली आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. बदला घेण्याच्या उद्देशाने ट्रान्समॅनने मुलीशी हे कृत्य केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. लिंगबदलानंतर मुलीतून मुलामध्ये रूपांतरित झालेल्या तरुणाना त्याच्या प्रेयसीला लग्नाची मागणी घातली होती. तिने नकार दिल्यानंतर त्याने तिला थेट यमसदनीच धाडले. (Murder She became a boy for her and proposed marriage On refusal…)

नंदिनी या 25 वर्षीय अभियंता मुलीची चेन्नईमध्ये वेट्रीमारन या ट्रान्समॅनने हत्या केली आहे. ट्रान्समनने प्रथम मुलीला साखळीने बांधले. त्यानंतर तिच्या मानेवर, हातावर आणि पायावर ब्लेडने वार करण्यात आले. एवढं करूनही तो थांबला नाही, तर त्याने तिला जिवंत जाळूनही टाकले. सध्या या कृत्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

नंदिनीने नाकारला होता लग्नाचा प्रस्ताव

पोलिसांनी थळंबूरमधून नंदिनीचा अर्धवट मृतदेह ताब्यात घेतला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदिनीला बेड्या बांधल्या होत्या. तिच्या हातावर, पायावर आणि मानेवर ब्लेडच्या खोल जखमा होत्या. या प्रकरणी पोलिसांनी 27 वर्षीय ट्रान्समन वेत्रीमारन याला अटक केली आहे. लग्नाचा प्रस्ताव फेटाळल्यानंतर त्याने नंदिनीची हत्या केल्याचे चौकशीत उघड झाले.

हेही वाचा : Uddhav Thackeray : हुकूमशाहीला उंबरठ्यावरच रोखण्याची गरज; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

- Advertisement -

या ठिकाणी भेटले होते पहिल्यांदा दोघे

आरोपी वेत्रीमारन हा मदुराईचा रहिवासी आहे. गेल्या काही महिन्यांपासून तो थोराईपक्कम येथील एका सॉफ्टवेअर कंपनीत कामाला होता. कंपनीतच त्याची आणि नंदिनीची भेट झाली. आधी त्यांची मैत्री झाली आणि नंतर ते प्रेमात पडले. मात्र जेव्हा वेत्रीमारनने नंदिनीसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला तेव्हा तिने नकार दिला.

हेही वाचा : Ram Mandir Ayodhya : राम मंदिराचा सातबारा भाजपच्या नाही तर रामाच्या नावावर : संजय राऊतांचा हल्लाबोल

वाढदिवसाला सरप्राईजच्या बहाण्याने फोन केला आणि मग…

वेत्रीमारनचा प्रस्ताव नाकारल्यानंतर नंदिनीचे दुसऱ्यासोबतच प्रेमसंबंध सुरू केले होते. यामुळे वेत्रीमारन प्रचंड संतापला. तिला मारून या बदला घ्यायचे त्याने ठरवले होते. नंदिनीच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याने तिला सरप्राईज देण्याच्या बहाण्याने बोलावून निर्जनस्थळी नेले आणि तिला जिवंत जाळले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -