घरदेश-विदेशकोरोनामुळे मृत्यू झालेल्या १०१ पत्रकारांच्या कुटुंबीयांना केंद्राकडून आर्थिक मदत

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या १०१ पत्रकारांच्या कुटुंबीयांना केंद्राकडून आर्थिक मदत

Subscribe

गेल्या वर्षभरापासून जगात कोरोनाचा कहर सुरू आहे. अशापरिस्थितीत सामान्य नागरिकांसह पत्रकार, डॉक्टर, पोलिस अशा कोरोना योद्ध्यांचे देखील कोरोनामुळे प्राण गेले आहे. मात्र केंद्र सरकारने कोरोना महामारीमुळे जीव गमावलेल्या एकूण १०१ पत्रकारांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देण्यासाठी ५.५ कोटी रुपये मंजूर केले असून ही माहिती सोमवारी सरकारने राज्यसभेत दिली. कोरोना महामारीमुळे मृत्यू झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यासाठी सरकारने विशेष मोहीम सुरू केली आहे. प्रेस माहिती कार्यालयाकडून प्राप्त अर्जांच्या आधारे अशा पत्रकारांची यादी तयार करण्यात आली आहे. प्रत्येक पत्रकाराच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपये दिले जाणार आहे, असे माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी संसदेच्या उच्च सभागृहाला दिलेल्या लेखी उत्तरात सांगितले.

दरम्यान १५ जुलैपर्यंत २१ हजार ८३७कोटी रुपयांचे १७.९४ लाख आरोग्य विमा दावे निकाली काढण्यात आले असल्याचे वित्त राज्यमंत्री भागवत कराड यांनी लोकसभेला दिलेल्या लेखी उत्तरात सांगितले. ते पुढे असेही म्हणाले की, महामारीच्या रोगाचा उद्रेक झाल्यापासून, भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) ने आरोग्य विमा दाव्यांच्या जलदगतीने मदतीसाठी अनेक पावले उचलली होती.

- Advertisement -

प्रसार भारतीने आंतरराष्ट्रीय वाहिनीच्या स्थापनेसाठी सल्ला सेवांसाठी एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट आमंत्रित केले आहे. या एजन्सीला सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करावा लागणार असल्याची माहिती अनुराग ठाकूर यांनी राज्यसभेत दिली. तर दुसर्‍या प्रश्नाला उत्तर देताना ठाकूर म्हणाले की, २०१६-२० दरम्यान २०४ खाजगी वाहिन्यांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत आणि मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याबद्दल १२८ प्रकरणांमध्ये इशारा देण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.


आंचल गोयलच परभणीच्या जिल्हाधिकारी; पालकमंत्री नवाब मलिकांची माहिती

 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -