भारतात कोरोनाचे संकट सातत्याने वाढत आहे. कोरोनामुळे बाधित झालेल्या लोकांबरोबरच मृतांची संख्याही वेगाने वाढत आहे. देशात आता संसर्ग झालेल्यांची संख्या १४ लाखांच्या पुढे गेली आहे. गेल्या २४ तासांत तब्बल ४९ हजार ९३१ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर ७०८ जणांचा मृत्यू देखील झाला आहे. हे मृत्यू अमेरिका आणि ब्राझीलपेक्षा सर्वात जास्त आहेत. अमेरिका आणि ब्राझीलमध्ये गेल्या २४ तासांत साधारण ४४५ आणि ५५६ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर भारताच्या तुलनेत मेक्सिकोमध्ये (७२९) कमी मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
India's COVID tally cross 14 Lakhs mark with 708 deaths & highest single-day spike of 49,931 cases reported in last 24 hours.
Total #COVID19 positive cases stand at 14,35,453 including 4,85,114 active cases, 9,17,568 cured/discharged/migrated & 32,771 deaths: Health Ministry pic.twitter.com/WbumsPdukU
— ANI (@ANI) July 27, 2020
आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार भारतात आतापर्यंत १४ लाख ३५ हजार ४५३ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी ३२ हजार ७७१ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर ९ लाख १७ हजार ५६८ लोकही बरे झाले आहेत.४ लाख ८५ हजार ११४ लोकांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कोरोनाची रूग्ण ओळखण्यासाठी भारतात रेकॉर्डब्रेकिंग चाचणी घेण्यात येत आहे, दररोज ५ लाखांहून अधिक कोरोना चाचणी करण्यात येत आहेत. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) च्या मते, शनिवारी देशात ५.१५ लाखाहून अधिक कोरोना चाचण्या घेण्यात आल्या असून आतापर्यंत देशात १.६८ कोटीहून अधिक चाचण्या घेण्यात आल्या आहेत.