कारगिल विजय दिनाच्या पार्श्वभूमीवर लष्कर प्रमुख बिपिन रावत आणि हवाईदल प्रमुख बी. एस. धनोआ यांनी कारगील युद्धात शहिद झालेल्या जवानांच्या द्रास स्मारक येथे जाऊन श्रद्धांजली वाहिली. कारगिल युद्धाला यावर्षी २० वर्ष पूर्ण झाले आहेत. कारगिल विजय दिनानिमित्ताने शहिदांना आदरांजली वाहिली जाते. शुरवीर जवानांच्या प्रती कृतज्ञताची भावना व्यक्त करुन त्यांना मानवंदना दिली जाते. १९९९ साली भारत-पाकिस्तान यांच्यात झालेल्या दोन महिन्यांच्या युद्धानंतर पाकिस्तानच्या सैन्यांनी धुम ठोकली आणि भारताचा विजय झाला. या युद्धात भारताचे ५२७ जवान शहीद झाले तर १३०० पेक्षा जास्त जवान जखमी झाले. मात्र, भारतीय जवानांचे हे बलिदान व्यर्थ गेले नाही. या लढाईत भारताचा विजय झाला आणि तत्कालीन भारताचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी २६ जुलै हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. तेव्हापासून हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरी केला जातो. या दिवशी कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली जाते.
#WATCH Air Chief Marshal Birender Singh Dhanoa, Army Chief General Bipin Rawat and Navy Chief Admiral Karambir Singh pay tribute at Kargil War Memorial in Dras on 20th #KargilVijayDiwas pic.twitter.com/0A6qagg1ZX
— ANI (@ANI) July 26, 2019
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील श्रीनगर येथील बदामी बाग छावणीत २० वा कारगिल विजय दिवस साजरा केला. ते शहिदांच्या द्रास स्मारक येथे जाऊन शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी जाणार होते. मात्र, हवामानात झालेल्या बदलांमुळे त्यांना द्रास स्मारक येथे जाता आले नाही.
President Ram Nath Kovind to now celebrate ’20 years of #KargilVijayDivas‘ at Badami Bagh Cantonment in Srinagar today. He was supposed to visit Drass memorial, but due to bad weather his visit was cancelled.Three Services Chiefs will pay homage at Drass war memorial. (file pic) pic.twitter.com/J8ZFDhB46V
— ANI (@ANI) July 26, 2019
केंद्रिय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यानी राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे जाऊन शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली.
Delhi: Defence Minister Rajnath Singh pays tribute at National War Memorial on 20th #KargilVijayDiwas. pic.twitter.com/PWssdObUJY
— ANI (@ANI) July 26, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर कारगिल विजय दिनानिमित्ताने शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
कारगिल विजय दिवस पर मां भारती के सभी वीर सपूतों का मैं हृदय से वंदन करता हूं। यह दिवस हमें अपने सैनिकों के साहस, शौर्य और समर्पण की याद दिलाता है। इस अवसर पर उन पराक्रमी योद्धाओं को मेरी विनम्र श्रद्धांजलि, जिन्होंने मातृभूमि की रक्षा में अपना सर्वस्व न्योछावर कर दिया। जय हिंद! pic.twitter.com/f7cpUFLO9o
— Narendra Modi (@narendramodi) July 26, 2019
कर्नाटकाच्या शिवमोगा येथे जवानांचे प्रतिमा तयार करण्यात आल्या असून त्यामार्फत कारगिल युद्धात शहिद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली आहे.
Karnataka: A park dedicated to Indian soldiers has been constructed in Shivamogga that will be inaugurated today on the occasion of #KargilVijayDiwas. pic.twitter.com/V5IQAkCtNY
— ANI (@ANI) July 26, 2019