मनमाड – कांद्याच्या दरात घसरण अजूनही सुरुच आहे. आज दुसऱ्या दिवशी कांद्याच्या दरात घसरण झाली आहे. आज कांद्याला ५३ हजार तर सरकारी ४८ हजार इतका भाव झाला आहे. कालचा कांद्याचा भावा ५४ हजार तर सरासरी ४९ हजार इतका होता. कालच्या तुलनेत आज १०० रुपयांची घसरण झाली आहे.
११वीचे ऑनलाईन वर्ग २ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. प्रवेश घेतला असो वा नसो हजेरी लावता येणार आहे. हा ऑनलाईन वर्ग दररोज ३ तास चालणार आहे, असा निर्णय राज्य शिक्षण मंडळाने घेतला आहे.
बृहन्मुंबई महापालिकेने २० एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान मास्क न घालणाऱ्यांकडून ३.५ कोटी रुपये दंड वसूल केला आहे.
Maharashtra: Brihanmumbai Municipal Corporation (BMC) collected around Rs 3.5 crores fine for 1,60,279 violations of face masks norms between April 20 to October 29. pic.twitter.com/2ODZdKphGV
— ANI (@ANI) October 31, 2020
देशात गेल्या २४ तासांत ४८ हजार २६८ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ५५१ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा ८१ लाक ३७ हजार ११९वर पोहोचला आहे. यापैकी १ लाख २१ हजार ६४१ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच गेल्या २४ तासांत देशातील ५९ हजार ४५४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे आतापर्यंत देशातील ७४ लाख ३२ हजार ८२९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या ५ लाख ८२ हजार ६४९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
With 48,268 new #COVID19 infections, India's total cases surge to 81,37,119. With 551 new deaths, toll mounts to 1,21,641.
Total active cases are 5,82,649 after a decrease of 11,737 in last 24 hrs.
Total cured cases are 74,32,829 with 59,454 new discharges in the last 24 hrs. pic.twitter.com/Z7QiRzYa8W
— ANI (@ANI) October 31, 2020
सरदार वल्लभभाई पटेल यांची आज १४५वी जयंती आहे. त्यानिमित्ताने गुजरातमधील ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरदार वल्लभभाई पटेलांना श्रद्धांजली वाहली.
Prime Minister Narendra Modi pays tribute to Sardar Vallabhbhai Patel on his birth anniversary, at the Statue of Unity in Kevadia, Gujarat pic.twitter.com/Q0mR50XP46
— ANI (@ANI) October 31, 2020
राज्यात शुक्रवारी ६ हजार १९० नव्या कोरोनाबाधित वाढ झाली असून १२७ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १६ लाख ७२ हजार ८५८वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत ४३ हजार ८३७ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६२ टक्के एवढा आहे. सविस्तर वाचा