राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संसदेने मंजूर केलेल्या तीन कृषीविधेयकांना मान्यता दिली आहे.
President Ram Nath Kovind gives assent to three farm bills passed by the Parliament. pic.twitter.com/hvLvMgNI8Y
— ANI (@ANI) September 27, 2020
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उद्यापासून बिहार दौऱ्यावर जाणार असल्याचे समोर येत आहे.
नुकतेच व्हीआरएस घेणारे बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी जेडीयूत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या पाटण्यातील निवासस्थानी जाऊन त्यांनी जेडीयूतमध्ये प्रवेश केला आहे.
Former Bihar DGP Gupteshwar Pandey, who recently took VRS, joins JD(U) at Chief Minister Nitish Kumar's residence in Patna. pic.twitter.com/jtVtl6eA1U
— ANI (@ANI) September 27, 2020
राज्यात गेल्या २४ तासांत १६९ नवे कोरोनाबाधित पोलीस कर्मचारी आढळले असून २ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा २२ हजार ६२९वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत २४१ पोलिसांचा मृत्यू झाला असून ३ हजार १९० पोलीस कोरोनामुक्त झाले आहे. तसेच सध्या १९ हजार १९८ पोलिसांवर उपचार सुरू आहेत.
169 police personnel tested positive for #COVID19 and 2 died in the last 24 hours, taking total cases to 22,629 in the force including 19,198 recoveries, 3,190 active cases and 241 deaths: Maharashtra Police pic.twitter.com/u3mF48bVsY
— ANI (@ANI) September 27, 2020
माजी मुख्यमंत्री आणि भाजपाच्या नेत्या उमा भारती यांना कोरोना संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. याबाबत माहिती उमा भारती यांनी स्वतः ट्विटरद्वारे दिली आहे.
१) मै आपकी जानकारी मै यह डाल रही हू की मैंने आज अपनी पहाड़ की यात्रा के समाप्ति के अन्तिम दिन प्रशासन को आग्रह करके कोरोना टेस्ट के टीम को बुलवाया क्यूँकि मुझे ३ दिन से हलका बुख़ार था ।
— Uma Bharti (@umasribharti) September 26, 2020
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शिवसेनेच्या सामनाच्या वृत्तपत्रासाठी संजय राऊतांना माझी मुलाखत घ्यायची होती. मी काही अटी घालून दिल्या होत्या. त्याप्रमाणेच चर्चा करण्यासाठी या भेटी आयोजन केले होते. भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही आहे.
Sanjay Raut ji wanted to take my interview for Shiv Sena's newspaper Saamana. The meeting was held to discuss the same as I had put certain conditions, I wanted it to be published unedited. No political talks held in meeting: Devendra Fadnavis, Former Maharashtra CM & BJP leader https://t.co/AuRcCtSOXU pic.twitter.com/2BabKfCXAU
— ANI (@ANI) September 27, 2020
सांगलीतील कारागृहातील २ कोरोनाबाधित कैद्यांनी पलायन केल्याचे समोर आले आहे. कोरोनाची लागण झाली असल्यामुळे या २ कैद्यांना क्वारंटाईन करण्यात आले होते.
दौंडचे आमदार राहुल कुल यांनी कोरोनावर मात केल्यानंतर २८ दिवस उलटल्यानंतर प्लाझ्मा दान केले. प्लाझ्मा दात्यांचा तुटवडा जाणवत असल्याच्या कारणामुळे राहुल कुल यांनी पुण्यातील ससून रुग्णालयात प्लाझ्मा दान केले.
कोरोना संकट काळात कुटुंबातील सदस्यांमधील नातेसंबंध वाढवण्यास कारणीभूत ठरले असून ते आणखीनच जवळ आले आहेत, असे पंतप्रधान मोदी मन की बात कार्यक्रमात म्हणाला.
The Corona crisis period has served in fostering bonding among family members, bringing them even closer: PM Modi on #MannKiBaat (File pic) pic.twitter.com/3AYFjVjchm
— ANI (@ANI) September 27, 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी ११ वाजता आपल्या ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमातून देशाला संबोधित करणार आहेत.
Prime Minister Narendra Modi to address the nation through his radio programme 'Mann Ki Baat' at 11 AM today. (file pic) pic.twitter.com/HAJ7EfHdKa
— ANI (@ANI) September 27, 2020
देशात गेल्या २४ तासांत ८८ हजार ६०० नवे रुग्ण आढळले असून १ हजार १२४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा ५९ लाख ९२ हजार ५३३वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत ९४ हजार ५०३ जणांचा मृत्यू झाला आहे.
Spike of 88,600 new #COVID19 cases & 1,124 deaths reported in India, in the last 24 hours.
COVID case tally stands at 59,92,533 including 9,56,402 active cases, 49,41,628 cured/discharged/migrated & 94,503 deaths: Ministry of Health & Family Welfare pic.twitter.com/VgZaTigtka
— ANI (@ANI) September 27, 2020
राज्यात शनिवारी तब्बल २३ हजार ६४४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. दिवसेंदिवस बऱ्या होणाऱ्या रुग्णांची वाढती संख्या पाहाता यामुळे कोरोनाची भिती कमी होण्यास मदत होणार आहे. शनिवारपर्यंत राज्यात १० लाख १६ हजार ४५० रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट ७६.९४ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. दुसरीकडे राज्यात शनिवारी दिवसभरात २० हजार ४१९ नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या १३ लाख २१ हजार १७६ इतकी झाली आहे. सविस्तर वाचा